बिजिंग | एशियन गेम्स 2023 स्पर्धेत टीम इंडियाच्या खेळाडूंकडून वैयक्तिक आणि सांघिक पातळीवर पदकांची लयलटू सुरु आहे. क्रिकेट टीम इंडियानंतर आता कबड्डी टीम इंडियाने आता सिलव्हर मेडल निश्चित केलं आहे. कबड्डी मेन्स टीम इंडियाने सेमी फायनलमध्ये आपल्या कट्ट्रर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला गाडलंय. टीम इंडियाने पाकिस्तानवर मात करत फायनलमध्ये धडक मारली आहे. टीम इंडियाने पाकिस्तानवर 61-14 अशा एकतर्फी फरकाने विजय मिळवत अंतिम फेरीत रुबाबदार एन्ट्री घेतली आहे. आता शनिवारी 7 ऑक्टोबर रोजी अंतिम सामन्यात टीम इंडियाचा इराण किंवा चीन तेपे विरुद्ध या दोघांपैकी एका टीमविरुद्ध लढाई होईल.
टीम इंडियाने या सामन्यात सुरुवातीपासून घट्ट पकड मिळवली होती. टीम इंडियाने पहिल्या हाफमध्ये आपला दबदबा कायम ठेवला. पहिल्या हाफच्या शेवटी टीम इंडियाने पाकिस्तानवर 30-5 अशा फरकाने आघाडी घेतली होती. त्यानंतर पुढे पाकिस्तान कमबॅक करत टीम इंडियावर कुरघोडी करेल, अशी अपेक्षा पाकिस्तानच्या चाहत्यांना होती. मात्र पाकिस्तानला ते अखेपर्यंत काही जमलं नाही. टीम इंडियाने शेवटपर्यंत पाकिस्तानवर दबदबा कायम ठेवत विजय मिळवला.
🇮🇳😍 𝟴𝘁𝗵 𝗚𝗢𝗟𝗗 𝗔𝗪𝗔𝗜𝗧𝗦 𝗨𝗦! The Indian men’s Kabaddi team storms into the finals with an unbeaten winning streak throughout the tournament, overpowering Pakistan in the semifinals.
🗓️ They will play the Final against Iran or Chinese Taipei tomorrow.
➡️ Follow… pic.twitter.com/F2spi0ULdh
— Team India at the Asian Games 🇮🇳 (@sportwalkmedia) October 6, 2023
दरम्यान क्रिकेट टीम इंडियानेही 6 ऑक्टोबर रोजी अंतिम सामन्यात एन्ट्री करत पदक निश्चित केलंय. टीम इंडियाने पहिल्या सेमी फायनलमध्ये बांगलादेशवर 9 विकेट्सने विजय मिळवला. आता टीम इंडियाचा गोल्ड मेडलसाठी फायनलमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध सामना होणार आहे. टीम इंडियाने बांगलादेशला 20 ओव्हरमध्ये 96 धावांवर ऑलआऊट केलं. त्यामुळे टीम इंडियाला 97 धावांचं आव्हान मिळालं. टीम इंडियाने हे आव्हान फक्त 1 विकेटच्या मोबदल्यात पू्र्ण केलं. टीम इंडियाने 97 धावा या 9.2 ओव्हरमध्येच पूर्ण केल्या.
नेपाळ विरुद्ध खणखणीत शतक ठोकणारा यशस्वी जयस्वाल बांगलादेश विरुद्ध अपयशी ठरला. यशस्वी झिरोवर आऊट झाला. मात्र त्यानंतर तिलक वर्मा आणि कॅप्टन ऋतुराज गायकवाड या दोघांनी टीम इंडियाला विजयापर्यंत पोहचवलं. या दोघांनी 97 धावांची नाबाद भागीदारी केली. ऋतुराजने 26 बॉलमध्ये नॉट आऊट 40 रन्स केल्या. तर तिलक वर्मा याने 26 बॉलमध्ये तोडफोड अर्धशतक केलं. तिलकने 6 सिक्स आणि 2 चौकारांच्या मदतीने नाबाद 55 धावा केल्या.
दरम्यान ताज्या आकडेवारीनुसार टीम इंडियाच्या खात्यात आता एकूण 89 मेडल्स झाले आहेत. यामध्ये टीम इंडियाकडे सर्वाधिक 36 कांस्य पदकं आहेत. 32 रौप्य पदकं आहेत. तर 21 गोल्ड मेडल्स आहेत.