AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विनेश फोगाटमुळे भारताचं ऑलिम्पिकमध्ये 4 पदकांचं नुकसान? WFI अध्यक्षांच्या वक्तव्याने खळबळ

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची कामगिरी हवी तशी राहिली नाही. भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत फक्त 6 पदकांवर समाधान मानावं लागलं. यात कुस्तीतील पदक फक्त 100 ग्रॅम अधिक वजनामुळे गमवलं.भारतीय कुस्ती संघाला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कमीत कमी पाच पदकांची अपेक्षा होती. असं असताना भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष संजय सिंह यांनी सांगितलं की...

विनेश फोगाटमुळे भारताचं ऑलिम्पिकमध्ये 4 पदकांचं नुकसान? WFI अध्यक्षांच्या वक्तव्याने खळबळ
Image Credit source: PTI
| Updated on: Aug 16, 2024 | 4:01 PM
Share

ऑलिम्पिक स्पर्धेत गेल्या काही वर्षात भारतीय कुस्तीपटूंचा दबदबा दिसून आला आहे. 2008 पासून कुस्तीत भारताने पदक मिळवलं आहे. मागच्या 16 वर्षांपासून हे समीकरण जुळून आलं आहे. ऑलिम्पिक, वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि एशियन गेम्समध्ये भारतीय कुस्तीपटूंनी वरचष्मा राहिला आहे. त्यामुळे भारतात कुस्तीचा एक वेगळाच चाहता वर्ग तयार झाला आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सहा कुस्तीपटूंनी पदकासाठी दावा ठोकला होता. पण यापैकी फक्त अमन सहरावतच पदक मिळवू शकला. दुसरीकडे, विनेश फोगाट 100 ग्रॅम अतिरिक्त वजनामुळे अपात्र ठरली. तर इतर चार स्पर्धक पदकाच्या शर्यतीतच पोहोचले नाहीत. कुस्तीपटूंच्या या कामगिरीमुळे भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष संजय सिंह नाराज आहेत. यासाठी त्यांनी देशातील कुस्तीपटूंच्या आंदोलनाला कारणीभूत धरलं आहे.

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह यांनी स्पोर्टक्रीडाला दिलेल्या मुलाखतीत कांस्य पदक विजेत्या अमन सहरावतचं कौतुक केलं. पण यावेळी त्यांनी इतर कुस्तीपटूंच्या कामगिरीवरून निराशा जाहीर केली. भारतीय कुस्ती महासंघाला कमीत कमी पाच पदकांची अपेक्षा होती. संजय सिंह यांच्या मते, कुस्तीपटू चांगल्या पद्धतीने योजना आखत होते, सर्वकाही ठीक चाललं होतं. पण बृजभूषण सिंह यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या विरोधात आंदोलन उभं राहिलं. त्यामुळे तयारीला कुठेतरी खीळ बसली. त्यामुळे पदकाची संधी हुकली.

भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष संजय सिंह यांनी कोणाचं नाव घेतलं नाही. पण त्यांचं वक्तव्य विनेश फोगाटकडे इशारा करत असल्याचं दिसत आहे. विनेश, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी इतर कुस्तीपटूंसह जंतरमंतरवर आंदोलन केलं होतं. संजय सिंह यांच्या दाव्यानुसार यामुळे भारताचं चार पदकांचं नुकसान झालं. नशीबानेही भारताची साथ दिली नाही, असंही संजय सिंह यांचं म्हणणं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे.

दुसरीकडे, ऑलिम्पिक अंतिम सामन्यापूर्वी अपात्र झाल्याचं खापरही संजय सिंह यांनी विनेश फोगाटवर फोडलं. वजन नियंत्रणात ठेवणं ही वैयक्तिकरित्या कुस्तीपटूची जबाबदारी असते. विनेशने ज्या सुविधा मागितल्या त्या त्यांना दिल्या होत्या, असंही संजय सिंह यांनी पुढे सांगितलं.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.