Ajinkya Rahane: मध्यरात्री 1 वाजता अजिंक्यसाठी रोहितची भावुक करणारी पोस्ट, लाडक्या अज्जूबद्दल काय बोलला?

अजिंक्य रहाणे यांनी काल सर्व फॉरमेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. अजिंक्य यांनी निवृत्ती घेतल्यानंतर अनेकांनी पोस्ट शेअर केली. आता रोहित शर्मानेही अजिंक्यसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

Ajinkya Rahane: मध्यरात्री 1 वाजता अजिंक्यसाठी रोहितची भावुक करणारी पोस्ट, लाडक्या अज्जूबद्दल काय बोलला?
| Updated on: Jul 31, 2026 | 12:00 PM

भारतीय क्रिकेटमधील सर्वात विश्वासार्ह फलंदाजांपैकी एक असलेल्या अजिंक्य रहाणेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. जवळपास दोन दशके भारतीय संघाची सेवा करणाऱ्या रहाणेने, इन्स्टाग्रामवर एक भावनिक व्हिडिओ शेअर करून आपल्या निर्णयाची घोषणा केली. रहाणेने व्हिडिओ शेअर करताच अनेक क्रिकेटपटूंनी आपल्या शुभेच्छा त्याला दिल्या. आता भारताचा माजी कर्णधार आणि मुंबई संघातील त्याचा दीर्घकाळचा सहकारी रोहित शर्मानेही एक भावनिक पोस्ट लिहून त्याला यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. रोहित शर्माने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रहाणेसाठी एक खास संदेश लिहिला आहे.

रोहित म्हणाला की, “रहाणेची मेहनत, समर्पण आणि व्यावसायिकता यांमुळे तो नेहमीच इतरांपेक्षा वेगळा ठरला आहे. आम्ही अनेक वर्षे एकाच ड्रेसिंग रूममध्ये होतो आणि मला माहित आहे की प्रत्येक यशामागे किती मेहनत असते. तुझी वचनबद्धता आणि व्यावसायिकता यांमुळे तू नेहमीच इतरांपेक्षा वेगळा ठरला आहेस. तुझ्या अद्भुत कारकिर्दीबद्दल अभिनंदन. भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.”

अजिंक्य रहाणेने भारतासाठी 85 कसोटी सामन्यांमध्ये 5,077 धावा केल्या. या काळात त्याने 12 शतके आणि 26 अर्धशतके झळकावली. कसोटी क्रिकेटमध्ये त्याची फलंदाजीची सरासरी 38.48 होती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 90 सामन्यांमध्ये 3 शतके आणि 24 अर्धशतकांसह 35.26 च्या सरासरीने 2,962 धावा केल्या. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रहाणेने २० सामन्यांमध्ये एका अर्धशतकासह 375 धावा केल्या. रहाणेचा कर्णधारपदाचा विक्रमही उत्कृष्ट होता. भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद भूषवताना त्याने ६ सामन्यांमध्ये ४ विजय आणि २ अनिर्णित सामने नोंदवले. विशेष म्हणजे, किमान पाच कसोटी सामन्यांचे कर्णधारपद भूषवलेल्या भारतीय कर्णधारांमध्ये त्याची विजयाची टक्केवारी सर्वोत्तम होती. त्याच्या कर्णधारपदाचा सर्वात संस्मरणीय अध्याय 2020-21 ची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी होती.

ॲडलेड कसोटीत भारताच्या दारुण पराभवानंतर, जेव्हा नियमित कर्णधार विराट कोहली मायदेशी परतला, तेव्हा रहाणेने संघाची सूत्रे हाती घेतली. त्याने मेलबर्नमधील बॉक्सिंग डे कसोटीत शतक झळकावत भारताला दणदणीत विजय मिळवून दिला आणि त्यानंतर ब्रिस्बेनच्या गब्बा येथे ऑस्ट्रेलियाचा प्रदीर्घ काळापासूनचा अपराजित विक्रम मोडून काढत ऐतिहासिक मालिका विजय घडवून आणला. इतकेच नव्हे, तर त्याच्या कर्णधारपदाखाली भारताने 2017 मध्ये धरमशाला कसोटीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करून मालिका जिंकली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us