Ishant Sharma | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बदलेल्या नियमावर इशांत आणि चहलची नाराजी

| Updated on: Jun 12, 2020 | 5:09 PM

जर आम्ही लाल चेंडू चमकवला नाही, तर तो स्विंग होणार नाही. जर स्विंग झाला नाही तर फलंदाजांसाठी ते फायद्याचे ठरेल, असं इशांत म्हणाला.

Ishant Sharma | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बदलेल्या नियमावर इशांत आणि चहलची नाराजी
Follow us on

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने क्रिकेटच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. त्यानुसार चेंडूची चमक वाढवण्यासाठी खेळाडूंना आता पूर्वीप्रमाणे घाम किंवा थुंकी/लाळ यांचा वापर करता येणार नाही. मात्र याच नियमावरुन भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा  (Ishant Sharma on Saliva Ban) आणि फिरकीपटू युजवेंद्र चहलने (Yujvendra Chahal) आपली मतं मांडली आहेत.

चेंडूला लाळ न लावण्याचा आयसीसीचा निर्णय चुकीचा असल्याचं  इशांत आणि चहलने म्हटलंय. पाच दिवसीय कसोटी सामन्यादरम्यान वेगवान गोलंदाज स्विंग करण्यासाठी चेंडूला लाळ लावून चमकवतात. जर असं केलं नाही तर चेंडू स्विंग होणार नाही आणि याचा फायदा हा फलंदाजांना होईल, असं इशांत शर्माने (Ishant Sharma) म्हटलं. स्पर्धा समान असावी, असंही तो म्हणाला. (Saliva Ban)

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने काही नवे नियम लागू केले आहेत. त्या नियमांनुसार, खेळाडूंकडून चेंडू चमकवण्यासाठी लाळेचा वापर केला जातो. मात्र, चेंडूला थुंकी किंवा लाळ लावल्याने कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यामुळे आयसीसीने डूला थुंकी किंवा लाळ लावल्यास मनाई केली आहे. तसेच, खेळाडूंनी चेंडूला लाळ लावली तर पंचांकडून खेळाडूला दोन वेळा इशारा दिला जाईल. तरीही खेळाडूने नियमांचं उल्लंघन केलं तर जो संघ फलंदाजी करत असेल त्या संघाला पाच धावांची पेनल्टी म्हणजे त्या संघाच्या धावांमध्ये पाच धावा आणखी जोडल्या जातील.

Saliva Ban

चेंडू चमकवणार नाही तर स्विंग होणार नाही : इशांत शर्मा

“जर आम्ही लाल चेंडू चमकवला नाही, तर तो स्विंग होणार नाही. जर स्विंग झाला नाही तर फलंदाजांसाठी ते फायद्याचे ठरेल. माझ्या मते, सामना हा समान असावा. संपूर्ण सामना फलंदाजांच्या बाजूने नसावा”, असं इशांत शर्मा म्हणाला.

चेंडू ड्रिफ्ट झाला नाही तर फलंदाजी करणे सोपं होते : युजवेंद्र चहल

“जेव्हा आपण चेंडू चमकवण्यासाठी लाळेसारख्या नैसर्गिक घटकाचा वापर करतो, तेव्हा वेगवान गोलंदाजाला स्विंग आणि स्पिनर्सला ड्रिफ्ट करण्यासाठी मदत मिळते. जर एक स्पिनर सामन्यादरम्यान चेंडूला ड्रिफ्ट करणार नसेल, तर त्याचा फायदा फलंदाजाला होईल आणि तो सहज फलंदाजी करेल”, असं युजवेंद्र चहल म्हणाला.

“चेंडूला चमकवण्यासाठी स्पिनर्स लाळेचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. आमच्यानंतर जेव्हा विरोधी संघातील वेगवान गोलंदाज बोलिंग करतात, तेव्हा ते सुद्धा हेच करतात. प्रत्येकजण गोलंदाजाच्या मदतीसाठी चेंडूला चमकवण्याचा प्रयत्न करतो. वेगवान गोलंदाजही  अशीच कृती करत असतात”, असंही चहल (Saliva Ban) म्हणाला.

संबंधित बातम्या :

रणजी खेळाडू ‘कोरोना’विरुद्ध मैदानात, 91 क्रिकेटपटूंचे रक्तदान

पाकचा माजी क्रिकेटपटू अब्दुल्ल रझाकचे भारतीय क्रिकेट संघावर गंभीर आरोप

पाक क्रिकेट बोर्डाने बलात्काराचे खोटे आरोप लावून मला संघाबाहेर काढले : शोएब अख्तर