
भारत-पाकिस्तान सामना तसचं आयसीसी टुर्नामेंटच्यावेळी शोएब अख्तर क्रिकेट एक्सपर्ट म्हणून स्टुडिओमध्ये बसतो. भारत किंवा पाकिस्तानच्या कुठल्याही माजी क्रिकेटपटुची आपला देश जिंकावा अशी इच्छा असते. ते स्वाभाविकही आहे. त्यात काही चुकीच नाही. शोएब अख्तरही याला अपवाद असू शकत नाही. आतापर्यंत भारत-पाकिस्तान सामन्याच्यावेळी जितका वेळा शोएब अख्तर क्रिकेट एक्सपर्ट म्हणून स्टुडिओमध्ये बसलाय, तितकावेळ त्याच्यावर भारताच कौतुक करण्याची आणि पाकिस्तानच्या पराभवाचं विश्लेषण करण्याची वेळ आलीय. मनातून त्याला पाकिस्तान जिंकावा असं वाटतं असतं. पण तसं होत नाही. तोंडावर का होईना, त्याला टीम इंडियाचं कौतुक करणं भाग पडतं. पण शेवटी तो पाकिस्तानीच आहे. मनातून तो भारताबद्दल कसा विचार करतो, ते आता समोर आलय.
पाकिस्तान आणि इंग्लंडमधील सुपर-8 सामन्याआधी शोएब अख्तरचे हे विचार समोर आले. “मी देवाला प्रार्थना करीन की, इंग्लंडने खूप खराब क्रिकेट खेळावं. त्यानंतर आपण सहज दोन पॉइंट घेऊ. भारताची टीम बाहेर जाऊदे. भारताची टीम टुर्नामेंटच्या बाहेर गेली, तर आपल्या आनंदाला पारावर उरणार नाही” असं शोएब अख्तर म्हणाला. त्याच्या मनात जे होतं, ते बाहेर आलं. खरंतर या मॅचमध्ये इंग्लंडच्या ब्रुकने शतकी खेळी साकारुन पाकिस्तानला पराभवाचा पाणी पाजलं. पाकिस्तानच्या सेमीफायनल प्रवेशाच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. ग्रुप 2 मधून सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारी इंग्लंड पहिली टीम बनली आहे.
🚨Shoaib Akhtar before and after the game😂
• Shoaib Akhtar before the start of the game – If England play this badly we’ll happily take the 2 points and our joy will know no bounds if India get knocked out and we make it to the semi-finals
• Shoaib Akhtar after the game -… https://t.co/brkXCyaKH7 pic.twitter.com/WzaZzenSxN
— 𝑨𝑻10 (@Loyalsachfan10) February 24, 2026
कॅप्टनशिपचे त्याच्यात गुण नाहीत
पाकिस्तानचा पराभव होताच शोएब अख्तरची भूमिका चटकन बदलली. त्याने लगेच पाकिस्तानी टीमला लक्ष्य केलं. त्यांच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. पाकिस्तानचा कॅप्टन सलमान अली आगाला त्याने टार्गेट केलं. कॅप्टनशिपचे त्याच्यात गुण नाहीत असं शोएब थेट म्हणाला. पाकिस्तानी टीमच्या प्लानिंगपासून ते टीमच्या रचनेवर त्याने आगपाखड केली. खरंतर हा शोएब अख्तर भारतीय वृत्त वाहिन्यांवर क्रिकेट विश्लेषक म्हणून येतो. त्याचे त्याला चांगले पैसेही मिळतात. क्रिकेट हा एक खेळ आहे. या खेळाकडे विशेषकरुन भारतीय क्रिकेटकडे पाहण्याची त्याची भावना काय आहे? ते स्पष्ट झालय.