AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Australia T 2o | टीम इंडियाचा मालिका विजय, अनुष्काचा विराटसाठी खास मेसेज

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरोधातील टी 20 मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

India vs Australia T 2o | टीम इंडियाचा मालिका विजय, अनुष्काचा विराटसाठी खास मेसेज
| Updated on: Dec 07, 2020 | 4:04 PM
Share

सिडनी : टीम इंडियाने दुसऱ्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सने (India Tour Australia 2020) शानदार विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने मालिकाही जिंकली. टीम इंडियाने 3 टी 20 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. मालिका विजयामुळे टीम इंडियाचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे. तसेच या मालिका विजयामुळे कर्णधार विराट कोहलीची (Team India Captain Virat Kohli) पत्नी आणि सिनेअभिनेत्री अनुष्का शर्मानेही (Anushka Sharma) टीम इंडियाचं अभिनंदन केलंय. तसेच विराटसाठी एक खास मेसेजही दिलाय. team india win t 20 series against australia anushka sharma congratulates his love virat kohli by special message

अनुष्काकडून शुभेच्छा

सिडनीमध्ये शानदार विजय मिळवल्यानंतर विराटने सामन्यातील एक फोटो शेअर केला. ”एक शानदार सामना. संघातील खेळाडूंनी फार चांगली कामगिरी केली” असं कॅप्शन विराटने या फोटोला दिलं. विराटने शेअर केलेल्या या फोटोवर अनुष्काने कमेंटद्वारे शुभेच्छा दिल्या. अनुष्काने कमेंटध्ये हार्ट रिएक्ट केलं. तसेच अनुष्काने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये टीम इंडियाचा फोटो शेअर केला. यावेळेस अनुष्काने टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या. “मालिका जिंकलात, फार चांगले खेळलात मेन इन ब्ल्यू”, अशा शब्दात टीम इंडियाचं अभिनंदन केलं. ‘माझ्या प्रेमाला अभिनंदन’ अशा शब्दात अनुष्काने विराटला खास मेसेज दिला.

अफगाणिस्तानच्या खेळाडूकडून टीम इंडियाचं अभिनंदन

टीम इंडियाच्या या मालिका विजयासाठी अफगाणिस्तानच्या खेळाडूने टीम इंडियाचं अभिनंदन केलं. फिरकीपटू रशिद खानने टीम इंडियाचं अभिनंदन केलं.  टीम इंडियाचा हा सलग 10 वा विजय ठरला. टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाला क्लीन स्वीप देण्याची संधी आहे. या टी 20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा मंगळवारी 8 डिसेंबरला खेळण्यात येणार आहे.

विराट पहिल्या कसोटीनंतर मायदेशी

टी 20 मालिकेनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरोधात 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर कर्णधार विराट कोहली मायदेशी परतणार आहे. विराट लवकरच बाबा होणार आहे. विराटच्या घरी जानेवारी महिन्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. या अशा क्षणी विराट आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवणार आहे. यामुळे विराटला बीसीसाआयने पाल्कत्वाची रजा मंजूर केली आहे.

संबंधित बातम्या :

India vs Australia 2020 | टीम इंडियाचा ‘हा’ खेळाडू वेस्ट इंडिजच्या आंद्रे रसेलपेक्षा सर्वोत्तम : हरभजन सिंह

India vs Australia 2020 2nd T20 Updates : हार्दिकची फटकेबाजी, धवनचे अर्धशतक, अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाची ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सने मात, सीरिजही जिंकली

team india win t 20 series against australia anushka sharma congratulates his love virat kohli by special message

Follow Us
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.