IND vs SL: आऊट होताच यशस्वी भडकला, श्रीलंकेच्या खेळाडूशी भर मैदानात राडा, थेट हेल्मेट… Video Viral

Yashasvi Jaiswal Fight: भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना एसएससी कोलंबो येथे खेळला जात आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जयस्वालला अर्धशतक पूर्ण करण्याची संधी होती, पण असिथा फर्नांडोच्या गोलंदाजीवर तो 45 धावांवर क्लीन बोल्ड झाला. बाद झाल्यानंतर जयस्वालने शांतपणे मैदान सोडायचे सोडून त्याने मैदानात राडा घातलेला पाहायला मिळाला.

IND vs SL: आऊट होताच यशस्वी भडकला, श्रीलंकेच्या खेळाडूशी भर मैदानात राडा, थेट हेल्मेट... Video Viral
| Updated on: Aug 23, 2026 | 12:28 PM

IND vs SL Test: भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना एसएससी कोलंबो येथे खेळला जात आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल भारतीय संघाला चांगली सुरुवात करून देण्यात अपयशी ठरले. जयस्वालला अर्धशतक पूर्ण करण्याची संधी होती, पण असिथा फर्नांडोच्या गोलंदाजीवर तो 45 धावांवर क्लीन बोल्ड झाला. बाद झाल्यानंतर जयस्वालने शांतपणे मैदान सोडायचे सोडून त्याने मैदानात राडा घातलेला पाहायला मिळाला.

भारताच्या डावातील 17 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर, असिथा फर्नांडो राऊंड द विकेट गोलंदाजी करत आला आणि त्याने एक अप्रतिम गुड-लेंथ चेंडू टाकला, जो उसळून वेगाने आतल्या बाजूला वळला. यशस्वी जयस्वालने ऑफ-साइडला पंच शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅटच्या आतल्या कडेला लागून यष्टींवर आदळला, ज्यामुळे तो बाद झाला. जयस्वालने फर्नांडोच्या षटकात सलग तीन चौकार मारले होते. विकेट मिळाल्यानंतर, फर्नांडोने आक्रमकपणे भारतीय फलंदाजाला तंबूत पाठवले.

बाद झाल्यानंतर जयस्वाल पॅव्हेलियनकडे परतत असताना दोन्ही खेळाडूंमध्ये जोरदार वाद आणि बाचाबाची झाली. परिस्थिती इतकी चिघळली की जयस्वाल श्रीलंकन ​​गोलंदाजाजवळ गेला आणि त्याला काहीतरी बोलताना दिसला. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून श्रीलंकन ​​कर्णधाराने हस्तक्षेप करून दोघांना वेगळे केले आणि परिस्थिती शांत केली. श्रीलंकन ​​कर्णधाराने यशस्वीला ड्रेसिंग रूममध्ये पाठवले. जयस्वालने आपल्या 45 धावांच्या खेळीत नऊ चौकार मारले.

यशस्वी जयस्वालच्या आधी, टीम इंडियाला केएल राहुलच्या रूपाने पहिला धक्का बसला. तो 33 चेंडूंमध्ये 18 धावांवर बाद झाला. त्याने आपल्या खेळीत दोन चौकार मारले. टीम इंडियाने या सामन्यासाठी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे. कुलदीप यादव संसर्गामुळे खेळत नाहीये आणि त्याच्या जागी सारांश जैनला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. पहिला कसोटी सामना भारतीय संघाने जिंकला आता दुसरा सामनाही भारतीय संघाने जिंकला तर भारतीय संघाला मालिका जिंकण्यात यशस्वी ठरेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us