AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझ्यावर गोळीबार करण्यात आला, लाठ्या काठ्या बरसल्या; फडणवीसांनी सांगितला रामजन्म भूमी आंदोलनाचा अनुभव

राहुल गांधी यांच्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात तरुणांशी संवाद साधला. मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांना रामजन्म भूमी आंदोलनाचा अनुभव सांगितला.

माझ्यावर गोळीबार करण्यात आला, लाठ्या काठ्या बरसल्या; फडणवीसांनी सांगितला रामजन्म भूमी आंदोलनाचा अनुभव
devendra fadnavis Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Aug 23, 2026 | 12:42 PM
Share

राहुल गांधी यांनी पुण्यात विद्यार्थिनींशी संवाद साधल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनीही नागपुरात जेन-झींशी संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरुणांशी बोलताना जुन्या आठवणींना उजाळा दिल्या. त्यांनी रामजन्म भूमी आंदोलनाचेही अनेक किस्से सांगितले. अयोध्यामध्ये पहिल्यांदा गोळीबार पाहिल्याचेही त्यांनी नमूद केले. आंदोलन हिंसक झाल्यानंतर आमच्यावर गोळीबार झाला होता, असा कटु अनुभव देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘मी ज्या प्रकारे राजकारणात आलो. हा माझा व्यवसाय नाही. ही माझी मिशन आहे. माझा विश्वास आहे की, राजकारण हे साधन आहे की, ज्यामुळे सामिजक आणि आर्थिक परिवर्तन घडवून आणले जाते. मी 18 वर्षांचा होतो. विद्यार्थी परिषदेने एक निश्चय केला होता. ज्यावेळी श्रीनगरमधील लालचौकावर भारताचा झेंडा फडकत नव्हता. त्यानंतर लालचौकावर झेंडा फडकवण्याचं ठरवलं. मी अवघ्या 18 वर्षांचा होतो. माझ्यासोबत काही जण 16 , काही 17 वर्षांचे होते. असे एकूण 10 हजार जण होते. आम्ही सर्व जम्मूला गेलो. नंतर उधमपूरला गेलो. तिकडे आम्हाला सैन्यांनी रोखल्यानंतर आम्ही चालत श्रीनगरला गेलो. त्यावेळी सैन्याने पुन्हा थांबवलं.

‘आम्हाला ताब्यात घेऊन दिल्लीत आणलं. नंतर प्रधानमंत्र्यांच्या घराला घेराव घातला. आम्हाला लालचौकावर झेंडा लावण्यास दिला नाही, तर तुम्ही जाऊन लावा, असे आम्ही त्यांना सांगितलं. परंतु त्यावेळचे तत्कालीन पंतप्रधान झेंडा लावू शकले नाहीत. 1992 मध्ये मुरली मनोहर जोशी आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लालचौकात झेंडा फडकावला, असेही फडणवीसांनी सांगितले.

‘मी 20 वर्षांचा असताना प्रयागराजला गेलो. तिथून अयोध्येला गेलो. पहिल्यांदा गोळीबार बघितला. आमच्यावर गोळीबार झाला. लाठीचार्ज झाला. आम्हाला ताब्यात घेतलं. त्यानंतर 18 दिवस सेंट्रल जेलमध्ये होतो. बाहेर आल्यानंतर पुन्हा त्याच आंदोलनात गेलो. 92 साली बाबरीचा ढाचा पाडण्यात आला, त्यावेळी मी तिथे होतो. त्याचा मला अभिमान आहे,असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्टार्टअप्सवरही भाष्य केलं. त्याच्यासाठी वेगळा फंड तयार केल्याचेही सांगितले. स्टार्ट्सअपला राज्य सरकार मदत करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Follow Us
मंत्र्याच्या जावयाला... भ्रष्टाचाराचं 'जामनेर पॅटर्न'; नाशिकसह महाराष्
मंत्र्याच्या जावयाला... भ्रष्टाचाराचं 'जामनेर पॅटर्न'; नाशिकसह महाराष्ट्रभरात... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
शिंदे गटाची इनकमिंग काही थांबेना! ठाकरे गटाला मोठा धक्का, धाराशिव...
शिंदे गटाची इनकमिंग काही थांबेना! ठाकरे गटाला दिला आणखी मोठा धक्का, धाराशिवच्या राजकारणात...
कुणालच्या घरी गरिबी नाही भरपूर पैसा, मात्र बापानं... अखेर कपरे भरवणारी
कुणालच्या घरी गरिबी नाही भरपूर पैसा, मात्र बापानं... अखेर थरकाप उडवणारी माहिती समोर
मोठी बातमी! रोहित पवारांच्या PA च्या लेकीचा संशयास्पद मृत्यू, आईशीच..
मोठी बातमी! रोहित पवारांच्या PA च्या लेकीचा संशयास्पद मृत्यू, आईशीच... हादरवणारी माहिती समोर
कुटुंबातील एकही व्यक्ती... कुणालच्या शेजाऱ्यांनीची चक्रावणारी माहिती
खवड्या डोंगर: कुटुंबातील एकही व्यक्ती... कुणालच्या शेजाऱ्यांनी दिली चक्रावणारी माहिती, अखेरच्या चार महिन्यांमध्ये...
मोठी बातमी! अभिजीत दीपकेंवर गंभीर गुन्हा दाखल, थेट शासकीय...
मोठी बातमी! अभिजीत दीपकेंवर गंभीर गुन्हा दाखल, थेट शासकीय... नेमकं काय घडलं?
भुलेश्वरमधील गणेश मुर्ती अपघात प्रकरणी खळबळ जनक माहिती समोर, अचानक...
भुलेश्वरमधील गणेश मुर्ती अपघात प्रकरणी खळबळ जनक माहिती समोर, अचानक मुर्तीचा...
राहुल गांधींकडून पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित
राहुल गांधींकडून पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित; मोदींवर दुहेरी भूमिकेचा आरोप
छात्रों की गूंज कार्यक्रमात प्रत्येकी ३५ हजार रुपये वाटप
नवनाथ बन यांचा दावा, छात्रों की गूंज कार्यक्रमात प्रत्येकी ३५ हजार रुपये वाटप
चित्रा वाघ यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
चित्रा वाघ यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल: