AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधींकडून पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित; मोदींवर दुहेरी भूमिकेचा आरोप

राहुल गांधींकडून पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित; मोदींवर दुहेरी भूमिकेचा आरोप

| Updated on: Aug 22, 2026 | 11:10 PM
Share

पुण्यात आयोजित छात्रों की गुंज या कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. हे तिघेही मनुस्मृतीचे पुरस्कर्ते असल्याची टीका राहुल गांधींनी केली. दिल्लीतील जंतरमंतर येथे मुलींनी शिव्या दिल्या असता पंतप्रधानांनी आक्षेप घेतला होता, मात्र मुलांना शिव्यांची सूट का, असा सवाल त्यांनी उपस्थित […]

पुण्यात आयोजित छात्रों की गुंज या कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. हे तिघेही मनुस्मृतीचे पुरस्कर्ते असल्याची टीका राहुल गांधींनी केली. दिल्लीतील जंतरमंतर येथे मुलींनी शिव्या दिल्या असता पंतप्रधानांनी आक्षेप घेतला होता, मात्र मुलांना शिव्यांची सूट का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मुलींच्या शिव्यांवर आक्षेप घेताना मुलांच्या शिव्यांकडे दुर्लक्ष करण्याच्या पंतप्रधानांच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले. या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी त्यांच्या समस्या मांडल्या. शरयू तोकडे या विद्यार्थिनीने MPSC पेपरफुटीचा गंभीर मुद्दा उपस्थित केला. २२ मार्च रोजी परीक्षा झाली असताना २० मार्च रोजी पेपर फुटला असल्याचा आरोप तिने केला. अनेक अधिकाऱ्यांची नावे समोर येऊनही हा मुद्दा दाबला जात असल्याचे तिने सांगितले. राहुल गांधींनी या विद्यार्थिनीला आवाज उठवण्याचे आश्वासन दिले. तसेच, भोजपुरी गायिका नेहा सिंह राठोडनेही सरकारला प्रश्न विचारल्याने सोशल मीडियावर ट्रोलिंग आणि गुन्हे दाखल होण्याच्या महिलांना येत असलेल्या अनुभवांवर चिंता व्यक्त केली. राहुल गांधींनी अशा महिलांना पाठिंबा दर्शवत, त्यांनाही अनेक वर्षांपासून शिव्या दिल्या जात असल्याचे सांगितले. पुणे म्हणजे प्रेम असे म्हणत त्यांनी कार्यक्रमाचा समारोप केला.

Published on: Aug 22, 2026 11:10 PM

Follow Us