AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशात 29 वर्षांपूर्वी या दोन व्यक्तीत झाला पहिला मोबाईल संवाद, कोणत्या कंपनीचा होता हॅंडसेट?

First Mobile Call : भारत आज मोबाईल आणि टेलिकॉम इंडस्ट्रीजमध्ये सर्वात अव्वल स्थानी आहे. भारत ही मोबाईल हँडसेट आणि इंटरनेटच्या वापरातील मोठी बाजारपेठ आहे. भारताचा प्रवास 5G च नाही तर 6G कडे सुरू झाला आहे. भारतात पहिला मोबाईल कॉल 31 जुलै 1995 रोजी झाला होता.

देशात 29 वर्षांपूर्वी या दोन व्यक्तीत झाला पहिला मोबाईल संवाद, कोणत्या कंपनीचा होता हॅंडसेट?
पहिला मोबाईल कॉल
| Updated on: Nov 19, 2024 | 2:38 PM
Share

देशात मोबाईल आणि हँडसेट इंडस्ट्रीज झपाट्याने फोफावत आहे. टेलिकॉम इंडस्ट्रीजमध्ये सर्वात अव्वल स्थानी आहे. भारत ही मोबाईल हँडसेट आणि इंटरनेटच्या वापरातील मोठी बाजारपेठ आहे. भारताचा प्रवास 5G च नाही तर 6G कडे सुरू झाला आहे. भारतात पहिला मोबाईल कॉल 31 जुलै 1995 रोजी झाला होता. या दोन नेत्यांमध्ये देशातील पहिला वायरलेस संवाद झाला होता. त्यावेळी मोबाईल आणि इंटरनेट हा सर्वसामान्यांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग होईल असे कुणालाही वाटले नव्हते.

या दोन नेत्यांमध्ये झाला पहिला मोबाईल संवाद

देशातील पहिल्या वायरलेस कॉलने भारतीय दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञानातील इतिहास बदलवून टाकला. 31 जुलै 1995 रोजी हा पहिला कॉल करण्यात आला होता. जगातील पहिला दोन मोठ्या नेत्यांमध्ये हा मोबाईल संवाद झाला होता. पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू आणि त्यावेळीचे केंद्रीय दूरसंचार मंत्री सुख राम या दोन मोठ्या नेत्यांमध्ये हा संवाद झाला होता. ही देशातील पहिली ऐतिहासिक घटना होती.

या हँडसेटचा झाला वापर

दिवंगत ज्योती बसू आणि सुख राम यांच्यात हा पहिला वायरलेस फोन कॉल करण्यात आला होता. हा फोन कॉल नोकिया हँडसेटवरून (Nokia Handset) करण्यात आला होता. भारताचा बी. के. मोदी आणि ऑस्ट्रेलियाच्या Telstra यांच्या एकत्रित Modi Telstra Network यांच्यामुळे हा पहिला कॉल यशस्वी झाला. तिथून पुढील वीस वर्षांत देशात मोबाईल आणि इंटरनेट क्षेत्रात मोठी पावलं टाकण्यात आली. तर त्यानंतर देशात या क्षेत्रात मोठा बदल झाला. कॉलनंतर इंटरनेटला, डेटा महत्त्व पूर्ण झाला.

किती आला होता खर्च

देशातील हा पहिला मोबाईल कॉल हा दोन शहरात झाला होता. कोलकत्ता आणि नवी दिल्ली या दोन शहरात हा मोबाईल कॉल करण्यात आला होता. त्यावेळी या दोन नेत्यांमधील संवादासाठी जवळपास प्रत्येक मिनिटाला 8.4 रुपयांचा खर्च आला होता. त्यात इनकमिंग आणि आऊटगोईंग कॉल विविध करांसह हा खर्च आला होता. यावेळी दोन्ही नेत्यांच्या या कॉलसाठी दोन्ही बाजूंनी प्रत्येक मिनिटाला 16.8 रुपये खर्च आला.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.