AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशात 29 वर्षांपूर्वी या दोन व्यक्तीत झाला पहिला मोबाईल संवाद, कोणत्या कंपनीचा होता हॅंडसेट?

First Mobile Call : भारत आज मोबाईल आणि टेलिकॉम इंडस्ट्रीजमध्ये सर्वात अव्वल स्थानी आहे. भारत ही मोबाईल हँडसेट आणि इंटरनेटच्या वापरातील मोठी बाजारपेठ आहे. भारताचा प्रवास 5G च नाही तर 6G कडे सुरू झाला आहे. भारतात पहिला मोबाईल कॉल 31 जुलै 1995 रोजी झाला होता.

देशात 29 वर्षांपूर्वी या दोन व्यक्तीत झाला पहिला मोबाईल संवाद, कोणत्या कंपनीचा होता हॅंडसेट?
पहिला मोबाईल कॉल
| Updated on: Nov 19, 2024 | 2:38 PM
Share

देशात मोबाईल आणि हँडसेट इंडस्ट्रीज झपाट्याने फोफावत आहे. टेलिकॉम इंडस्ट्रीजमध्ये सर्वात अव्वल स्थानी आहे. भारत ही मोबाईल हँडसेट आणि इंटरनेटच्या वापरातील मोठी बाजारपेठ आहे. भारताचा प्रवास 5G च नाही तर 6G कडे सुरू झाला आहे. भारतात पहिला मोबाईल कॉल 31 जुलै 1995 रोजी झाला होता. या दोन नेत्यांमध्ये देशातील पहिला वायरलेस संवाद झाला होता. त्यावेळी मोबाईल आणि इंटरनेट हा सर्वसामान्यांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग होईल असे कुणालाही वाटले नव्हते.

या दोन नेत्यांमध्ये झाला पहिला मोबाईल संवाद

देशातील पहिल्या वायरलेस कॉलने भारतीय दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञानातील इतिहास बदलवून टाकला. 31 जुलै 1995 रोजी हा पहिला कॉल करण्यात आला होता. जगातील पहिला दोन मोठ्या नेत्यांमध्ये हा मोबाईल संवाद झाला होता. पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू आणि त्यावेळीचे केंद्रीय दूरसंचार मंत्री सुख राम या दोन मोठ्या नेत्यांमध्ये हा संवाद झाला होता. ही देशातील पहिली ऐतिहासिक घटना होती.

या हँडसेटचा झाला वापर

दिवंगत ज्योती बसू आणि सुख राम यांच्यात हा पहिला वायरलेस फोन कॉल करण्यात आला होता. हा फोन कॉल नोकिया हँडसेटवरून (Nokia Handset) करण्यात आला होता. भारताचा बी. के. मोदी आणि ऑस्ट्रेलियाच्या Telstra यांच्या एकत्रित Modi Telstra Network यांच्यामुळे हा पहिला कॉल यशस्वी झाला. तिथून पुढील वीस वर्षांत देशात मोबाईल आणि इंटरनेट क्षेत्रात मोठी पावलं टाकण्यात आली. तर त्यानंतर देशात या क्षेत्रात मोठा बदल झाला. कॉलनंतर इंटरनेटला, डेटा महत्त्व पूर्ण झाला.

किती आला होता खर्च

देशातील हा पहिला मोबाईल कॉल हा दोन शहरात झाला होता. कोलकत्ता आणि नवी दिल्ली या दोन शहरात हा मोबाईल कॉल करण्यात आला होता. त्यावेळी या दोन नेत्यांमधील संवादासाठी जवळपास प्रत्येक मिनिटाला 8.4 रुपयांचा खर्च आला होता. त्यात इनकमिंग आणि आऊटगोईंग कॉल विविध करांसह हा खर्च आला होता. यावेळी दोन्ही नेत्यांच्या या कॉलसाठी दोन्ही बाजूंनी प्रत्येक मिनिटाला 16.8 रुपये खर्च आला.

Follow Us
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर
फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री!
Uddhav Thackeray | फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री! आज शिर्डीत मोठं शक्तिप्रदर्शन