AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jio Offer : Jio यूजर्ससाठी खास बातमी, अमर्यादित कॉलिंग आणि डेटा फक्त 91 रुपयात, ऑफर जाणून घ्या…

Jio सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन तुम्हाला माहित आहे का, 91 रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना रोज डेटा देखील मिळेल. त्याचबरोबर अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएस सारखे फायदेही दिले जात आहेत. जाणून घ्या....

Jio Offer : Jio यूजर्ससाठी खास बातमी, अमर्यादित कॉलिंग आणि डेटा फक्त 91 रुपयात, ऑफर जाणून घ्या...
जिओ ऑफरImage Credit source: social
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: Aug 09, 2022 | 6:09 AM
Share

मुंबई : रोज वाढणारे इंधनाचे दर, वाढती महागाई, सगळ्याच गोष्टींच्या वाढणाऱ्या किंमत पाहता आता दैनंदिन वापराच्या गोष्टीतही पैसे खर्च करताना विचार करावा लागतो. कारण, तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही घ्यायची आहेच. पण, आपण त्यात कोणती गोष्ट स्वस्त मिळणार, रिचार्ज (Recharge) स्वस्तात मिळणार का, कमी पैसे आणि अधिक वैधता देतील का, याचाही विचार करू लागतो. आज आम्ही तुम्हाला अशीच एक तुमच्या कामाची बातमी सांगणार आहोत. तुम्हाला माहिती आहे का की जिओ (Jio Offer) वापरकर्त्यांकडे 100 रुपयांच्या खाली एक उत्तम रिचार्ज पर्याय आहे. आज आम्ही तुम्हाला या प्लानबद्दल सांगत आहोत. कंपनी 91 रुपयांचा प्लान ऑफर करते. ज्यामध्ये कॉलिंगपासून डेटापर्यंत सर्व सुविधा दिल्या जात आहेत. यामध्ये यूजर्सला रोजचा डेटाही मिळेल. त्याचबरोबर अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएस (SMS) सारखे फायदेही दिले जात आहेत. Airtel-Vi देखील Jio च्या 91 रुपयांच्या प्लॅनच्या तुलनेत दोन प्लॅन ऑफर करते परंतु त्यांची किंमत अनुक्रमे 99 आणि 98 रुपये आहे.

जिओचा 91 रुपयांचा प्लॅन

या प्लानमध्ये यूजर्सना दररोज 100MB डेटा दिला जातो. अतिरिक्त 200MB डेटा देखील दिला जात आहे. त्याची वैधता 28 दिवस आहे. संपूर्ण वैधता दरम्यान, वापरकर्त्यांना 3GB डेटा दिला जात आहे. जेव्हा एका दिवसाची मर्यादा संपेल तेव्हा तुम्हाला 64 Kbps चा स्पीड मिळेल. यासोबतच अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधाही दिली जाणार आहे. त्याच वेळी, याशिवाय, Jio अ‍ॅप्सचे विनामूल्य सदस्यता देखील उपलब्ध आहे. हा प्लान फक्त JioPhone वापरकर्त्यांसाठी आहे.

Vodafone Idea चा 98 रुपयांचा प्लान

या प्लानची वैधता 15 दिवस आहे. यामध्ये 200MB डेटा दिला जात आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधाही दिली जात आहे. यामध्ये तुम्हाला SSS लाभ मिळत नाही.

Airtel चा 99 रुपयांचा प्लान

Vodafone Idea प्रमाणेच यामध्ये देखील 200MB डेटा दिला जात आहे. त्याची वैधता 28 दिवस आहे. यामध्ये यूजर्सना 99 रुपयांचा टॉकटाइम दिला जात आहे. याशिवाय कॉलिंगसाठी 2.5 पैसे प्रति सेकंद शुल्क आकारले जाईल. त्याचवेळी एसटीडी एसएमएस करण्यासाठी 1.5 रुपये द्यावे लागतील. याशिवाय 1 रुपये स्थानिक एसएमएस शुल्क भरावे लागेल.

महागाईत मोबाईल रिचार्ज घेतानाही विचार करावा लागत आहे. तुम्हाला आम्ही वरीलप्रमाणे स्वस्त प्लॅन सांगितले आहे. ते पाहा आणि तुम्हाला जो परवडेल तो प्लॅन घ्या त्यासह पैसेही वाचवा.

Follow Us
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच...
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच... एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?