चावट ग्रुपमधून सुटका होणार, व्हॉट्सअॅपचं नवं फीचर लवकरच!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

मुंबई: व्हॉट्सअॅप युझर्सना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण आता तुमच्या परवानगीशिवाय कोणीही तुम्हाला कोणत्याही ग्रुपमध्ये अॅड करु शकणार नाही. लवकरच हे फीचर व्हॉट्सअॅपला आणावं लागणार आहे. कारण इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने व्हॉट्सअॅपला तसं फीचर बनवण्याचे आदेश दिले आहेत. या फीचरमुळे कोणी  तुम्हाला एखाद्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करणार असेल, तर आधी तुमची परवानगी घ्यावी लागेल. […]

चावट ग्रुपमधून सुटका होणार, व्हॉट्सअॅपचं नवं फीचर लवकरच!
Follow us on

मुंबई: व्हॉट्सअॅप युझर्सना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण आता तुमच्या परवानगीशिवाय कोणीही तुम्हाला कोणत्याही ग्रुपमध्ये अॅड करु शकणार नाही. लवकरच हे फीचर व्हॉट्सअॅपला आणावं लागणार आहे. कारण इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने व्हॉट्सअॅपला तसं फीचर बनवण्याचे आदेश दिले आहेत. या फीचरमुळे कोणी  तुम्हाला एखाद्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करणार असेल, तर आधी तुमची परवानगी घ्यावी लागेल.

सध्याच्या फीचरनुसार कोणीही सरसकट कोणालाही ग्रुपमध्ये विनापरवानगीने अॅड करु शकतो. त्यामुळे काहींना इच्छा नसूनही विविध ग्रुपमध्ये राहावं लागतं. ग्रुपमधून बाहेर पडणंही कधीकधी अवघड होतं. त्यामुळे नव्या फीचरमुळे युझरच्या परनवानगीशिवाय त्याला ग्रुपमध्ये अॅड करता येणार नाही.

कोणालाही विनापरवाना कोणत्याही ग्रुपमध्ये अॅड केलं जात असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे सरकारने हे पाऊल उचललं आहे.  सरकारी यंत्रणा सर्व तक्रारी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला पाठवत होते. त्यानंतर या मंत्रालयाने व्हॉट्सअॅपला हे फीचर आणण्यास सांगितलं आहे.

यापूर्वी व्हॉट्सअॅपने एक फीचर आणलं होतं, त्यानुसार ग्रुप अॅडमिनकडे युझरचा नंबर सेव्ह असणं आवश्यक होतं.  तसंच जर एखाद्याने दोनवेळा ग्रुप सोडला, तर अॅडमिन त्याला पुन्हा ग्रुपमध्ये अॅड करु शकत नव्हता. मात्र हे फीचरही परिणामकारक ठरलं नाही.

मंत्रालयाने व्हॉट्सअॅपला पाठवलेल्या पत्रात म्हटलंय की, युझरने दोनवेळा ग्रुप सोडल्यानंतरही कोणी दुसरा अॅडमिन त्याला पुन्हा अॅड करु शकतो. काही घटनांमध्ये वेगवेगळ्या नंबरवरुन नवे व्हॉट्सअॅप ग्रुप बनवले गेले आणि युझर्सना इच्छा नसूनही त्यामध्ये अॅड केलं.

दरम्यान, व्हॉट्सअॅपने अद्याप मंत्रालयाच्या पत्राला कोणताही ‘रिप्लाय’ पाठवलेला नाही. सध्या भारतात  व्हॉट्सअॅपचे जवळपास 20 कोटी युझर्स महिन्याला कार्यरत असतात. असंख्य ग्रुपही कार्यरत आहेत. त्यामुळे व्हॉट्सअॅपने नवं फीचर आणलं तर नकोशा ग्रुपमधून सुटका मिळणार आहे.