AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्री Wifi का बंद करावे? अर्ध्या लोकांना याचे फायदेच माहिती नाहीत

तुमच्यापैकी अनेकांच्या घरात वायफाय असेल. बऱ्याच लोकांच्या घरातील वायफाय 24 तास सुरु असते. याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

रात्री Wifi का बंद करावे? अर्ध्या लोकांना याचे फायदेच माहिती नाहीत
wifi
| Updated on: Aug 24, 2025 | 10:35 PM
Share

तुमच्यापैकी अनेकांच्या घरात वायफाय असेल. बऱ्याच लोकांच्या घरातील वायफाय 24 तास सुरु असते. याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. वायफाय सुरु असेल तर तुम्हाला रात्री चांगली झोप येत नाही, तसेच सकाळी उठताच थकवा जाणवतो. कारण वायफायचे सिग्नला तुमच्या झोपेसाठी घातक ठरू शकतात. काही अहवालांनुसार वायफायमधून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरीमुळे झोपेत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे रात्री वायफाय बंद करणे फायदेशी ठरते.

वायफायचे तोटे काय आहेत?

ऑस्ट्रेलियाच्या आरएमआयटी विद्यापीठाने याबाबत एक अहवाल सादर केला आहे. यानुसार वायफायच्या जवळ झोपणाऱ्या 27 टक्के लोकांना निद्रानाशासारख्या समस्या जाणवतात. तसेच 2021 च्या अहवालानुसार उंदरांवर याचा परिणान झाल्याचे नमूद करण्यात आले होते. 2.4 GHz वायफाय सिग्नलमुळे उंदरांची झोप कमी झाली होती. मात्र WHO आणि ICNIRP च्या म्हणण्यांनुसार वायफायचे रेडिएशन कमी असतात, याचा मानवाच्या झोपेवर परिणाम होत नाही. मात्र तरीही खबरदारी म्हणून तुम्ही ते बंद करु शकता.

वायफाय बंद करण्याचे फायदे काय आहेत?

तुमच्यापैकी ज्या लोकांना झोपेची समस्या असेल त्यांना रात्री वायफाय बंद केल्यास आराम मिळू शकतो. यामुळे तुम्ही गाढ झोपू शकता. त्याचबरोबर रात्री वायफाय बंद केल्यास वीज आणि इंटरनेटही वाचते. तसेय राउटरचे आयुष्यही वाढते. वायफाय रेडिएशनमुळे मोठे नुकसान होत नाही, मात्र ते बंद केल्याने मनाला शांती मिळते आणि ताणतणाव दूर होतो, त्यामुळे वायफाय बंद करणे फायद्याचे ठरेल.

वायफाय कधी बंद करू नये?

तुमच्या घरात कॅमेरा, स्मार्ट लाईट, व्हॉइस असिस्टंट अशी उपकरणे असतील तर वायफाय बंद करु नये. असे केल्याने या उपकरणांचे काम थांबेल. वायफायशिवाय स्मार्ट होम ऑटोमेशन नीट कार करु शकणार नाही. जर शक्य असल्यास, तुम्ही राउटर बेडरूमच्या बाहेर ठेवू शकता, ज्यामुळे रात्री झोपताना आराम मिळेल आणि तुमच्या घरातील उपकरणेही योग्यरित्या काम करतील. त्यामुळे तुमच्या घरात वायफाय असेल किंवा तुम्ही वायफाय घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही वरील मुद्यांचा एकदा नक्की विचार करावा.

Follow Us
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!