‘औरंगाबादचं संंभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशीव करा’

पंकज भनारकर, टीव्ही 9 मराठी, मुंबई: उत्तर प्रदेशात नामांतराची मालिका सुरु असताना, महाराष्ट्रातही मागणी जोर धरु लागली आहे. औरंगाबादचं नाव संभाजीनगर, तर उस्मानाबादचं नाव धाराशीव करण्याची मागणी शिवसेनेने लावून धरली आहे. शिवसेना नेत्यांनी वेळोवेळी ही भूमिका मांडली आहेच, शिवाय आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन मुख्यमंत्र्यांना तसा सवाल केला आहे. संजय राऊत यांनी […]

'औरंगाबादचं संंभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशीव करा'
Follow us
| Updated on: Nov 07, 2018 | 5:40 PM

पंकज भनारकर, टीव्ही 9 मराठी, मुंबई: उत्तर प्रदेशात नामांतराची मालिका सुरु असताना, महाराष्ट्रातही मागणी जोर धरु लागली आहे. औरंगाबादचं नाव संभाजीनगर, तर उस्मानाबादचं नाव धाराशीव करण्याची मागणी शिवसेनेने लावून धरली आहे. शिवसेना नेत्यांनी वेळोवेळी ही भूमिका मांडली आहेच, शिवाय आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन मुख्यमंत्र्यांना तसा सवाल केला आहे. संजय राऊत यांनी “योगी आदित्यनाथ यांनी फैजाबादचे अयोध्या केले, अलाहाबादचे प्रयाग तिर्थ केले, मुख्यमंत्री देवेंद्रजी औरंगाबादचे संभाजी नगर आणि उस्मानाबादचे धाराशीव कधी करणार? जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम!” असं ट्विट केलं आहे.

विचारधारेचा प्रभाव सरकारच्या कामात पडतोच. पण सरकारला कधी कधी जनभावनेचाही विचार करावा लागतो. किंवा मग आपला अजेंडा राबवणं तर त्यांचं काम असतंच. असंच काहीसं सध्या देशात सुरु असल्याचं दिसतंय. कारण शहरांचं नामकरण जोरात सुरु आहे. उत्तर प्रदेशानंतर गुजरात आणि गुजरातनंतर महाराष्ट्रात ही मालिका सुरु होण्याची चिन्हं आहेत.

शहरांची नावं बदलण्याचा सपाटा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नावं बदलण्याचा सपाटा सुरु केला आहे. अलाहाबादचं नाव प्रयागराज केलं त्यानंतर आता फैजाबादचं जिल्ह्याचं नाव अयोध्या केलं. उत्तर प्रदेशानंतर आता गुजरातमध्येही अहमदाबादचं नाव कर्णावती करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री नितीन पटेलांनी केली आहे. आता महाराष्ट्रातही औरंगाबादचं नाव संभाजीनगर, तर उस्मानाबादचं नाव धाराशीव करण्याची मागणी शिवसेनेने लावून धरली आहे.

खरं तर याआधीही 1995 मध्ये युती सरकारच्यावेळी बॉम्बेचं नाव मुंबई झालं. पुढे कलकत्ता कोलकाता, मद्रासचं  चेन्नई झालं. सरकार बदललं की विचारधारेप्रमाणं शहरांची नावंही बदलतात. औरंगाबादचं बोलायचं झालं तर शिवसेना आणि भाजपकडून याआधीही संभाजीनगर नाव ठेवण्याची मागणी झाली आहे. पण 4 वर्ष उलटली.

असं असलं तरी प्रश्न सध्या एकच उरतोय की नावं बदलून शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे का?

Non Stop LIVE Update
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.
कुटुंबियांची साथ नाही? दादांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, मेरी माँ...
कुटुंबियांची साथ नाही? दादांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, मेरी माँ....