AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘औरंगाबादचं संंभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशीव करा’

पंकज भनारकर, टीव्ही 9 मराठी, मुंबई: उत्तर प्रदेशात नामांतराची मालिका सुरु असताना, महाराष्ट्रातही मागणी जोर धरु लागली आहे. औरंगाबादचं नाव संभाजीनगर, तर उस्मानाबादचं नाव धाराशीव करण्याची मागणी शिवसेनेने लावून धरली आहे. शिवसेना नेत्यांनी वेळोवेळी ही भूमिका मांडली आहेच, शिवाय आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन मुख्यमंत्र्यांना तसा सवाल केला आहे. संजय राऊत यांनी […]

'औरंगाबादचं संंभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशीव करा'
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Nov 07, 2018 | 5:40 PM
Share

पंकज भनारकर, टीव्ही 9 मराठी, मुंबई: उत्तर प्रदेशात नामांतराची मालिका सुरु असताना, महाराष्ट्रातही मागणी जोर धरु लागली आहे. औरंगाबादचं नाव संभाजीनगर, तर उस्मानाबादचं नाव धाराशीव करण्याची मागणी शिवसेनेने लावून धरली आहे. शिवसेना नेत्यांनी वेळोवेळी ही भूमिका मांडली आहेच, शिवाय आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन मुख्यमंत्र्यांना तसा सवाल केला आहे. संजय राऊत यांनी “योगी आदित्यनाथ यांनी फैजाबादचे अयोध्या केले, अलाहाबादचे प्रयाग तिर्थ केले, मुख्यमंत्री देवेंद्रजी औरंगाबादचे संभाजी नगर आणि उस्मानाबादचे धाराशीव कधी करणार? जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम!” असं ट्विट केलं आहे.

विचारधारेचा प्रभाव सरकारच्या कामात पडतोच. पण सरकारला कधी कधी जनभावनेचाही विचार करावा लागतो. किंवा मग आपला अजेंडा राबवणं तर त्यांचं काम असतंच. असंच काहीसं सध्या देशात सुरु असल्याचं दिसतंय. कारण शहरांचं नामकरण जोरात सुरु आहे. उत्तर प्रदेशानंतर गुजरात आणि गुजरातनंतर महाराष्ट्रात ही मालिका सुरु होण्याची चिन्हं आहेत.

शहरांची नावं बदलण्याचा सपाटा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नावं बदलण्याचा सपाटा सुरु केला आहे. अलाहाबादचं नाव प्रयागराज केलं त्यानंतर आता फैजाबादचं जिल्ह्याचं नाव अयोध्या केलं. उत्तर प्रदेशानंतर आता गुजरातमध्येही अहमदाबादचं नाव कर्णावती करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री नितीन पटेलांनी केली आहे. आता महाराष्ट्रातही औरंगाबादचं नाव संभाजीनगर, तर उस्मानाबादचं नाव धाराशीव करण्याची मागणी शिवसेनेने लावून धरली आहे.

खरं तर याआधीही 1995 मध्ये युती सरकारच्यावेळी बॉम्बेचं नाव मुंबई झालं. पुढे कलकत्ता कोलकाता, मद्रासचं  चेन्नई झालं. सरकार बदललं की विचारधारेप्रमाणं शहरांची नावंही बदलतात. औरंगाबादचं बोलायचं झालं तर शिवसेना आणि भाजपकडून याआधीही संभाजीनगर नाव ठेवण्याची मागणी झाली आहे. पण 4 वर्ष उलटली.

असं असलं तरी प्रश्न सध्या एकच उरतोय की नावं बदलून शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे का?

Follow Us
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल...
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?