AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘औरंगाबादचं संंभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशीव करा’

पंकज भनारकर, टीव्ही 9 मराठी, मुंबई: उत्तर प्रदेशात नामांतराची मालिका सुरु असताना, महाराष्ट्रातही मागणी जोर धरु लागली आहे. औरंगाबादचं नाव संभाजीनगर, तर उस्मानाबादचं नाव धाराशीव करण्याची मागणी शिवसेनेने लावून धरली आहे. शिवसेना नेत्यांनी वेळोवेळी ही भूमिका मांडली आहेच, शिवाय आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन मुख्यमंत्र्यांना तसा सवाल केला आहे. संजय राऊत यांनी […]

'औरंगाबादचं संंभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशीव करा'
| Updated on: Nov 07, 2018 | 5:40 PM
Share

पंकज भनारकर, टीव्ही 9 मराठी, मुंबई: उत्तर प्रदेशात नामांतराची मालिका सुरु असताना, महाराष्ट्रातही मागणी जोर धरु लागली आहे. औरंगाबादचं नाव संभाजीनगर, तर उस्मानाबादचं नाव धाराशीव करण्याची मागणी शिवसेनेने लावून धरली आहे. शिवसेना नेत्यांनी वेळोवेळी ही भूमिका मांडली आहेच, शिवाय आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन मुख्यमंत्र्यांना तसा सवाल केला आहे. संजय राऊत यांनी “योगी आदित्यनाथ यांनी फैजाबादचे अयोध्या केले, अलाहाबादचे प्रयाग तिर्थ केले, मुख्यमंत्री देवेंद्रजी औरंगाबादचे संभाजी नगर आणि उस्मानाबादचे धाराशीव कधी करणार? जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम!” असं ट्विट केलं आहे.

विचारधारेचा प्रभाव सरकारच्या कामात पडतोच. पण सरकारला कधी कधी जनभावनेचाही विचार करावा लागतो. किंवा मग आपला अजेंडा राबवणं तर त्यांचं काम असतंच. असंच काहीसं सध्या देशात सुरु असल्याचं दिसतंय. कारण शहरांचं नामकरण जोरात सुरु आहे. उत्तर प्रदेशानंतर गुजरात आणि गुजरातनंतर महाराष्ट्रात ही मालिका सुरु होण्याची चिन्हं आहेत.

शहरांची नावं बदलण्याचा सपाटा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नावं बदलण्याचा सपाटा सुरु केला आहे. अलाहाबादचं नाव प्रयागराज केलं त्यानंतर आता फैजाबादचं जिल्ह्याचं नाव अयोध्या केलं. उत्तर प्रदेशानंतर आता गुजरातमध्येही अहमदाबादचं नाव कर्णावती करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री नितीन पटेलांनी केली आहे. आता महाराष्ट्रातही औरंगाबादचं नाव संभाजीनगर, तर उस्मानाबादचं नाव धाराशीव करण्याची मागणी शिवसेनेने लावून धरली आहे.

खरं तर याआधीही 1995 मध्ये युती सरकारच्यावेळी बॉम्बेचं नाव मुंबई झालं. पुढे कलकत्ता कोलकाता, मद्रासचं  चेन्नई झालं. सरकार बदललं की विचारधारेप्रमाणं शहरांची नावंही बदलतात. औरंगाबादचं बोलायचं झालं तर शिवसेना आणि भाजपकडून याआधीही संभाजीनगर नाव ठेवण्याची मागणी झाली आहे. पण 4 वर्ष उलटली.

असं असलं तरी प्रश्न सध्या एकच उरतोय की नावं बदलून शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे का?

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.