AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्न की नोकरी? कंपनीची अजब ऑफर, महिलेने घेतला असा निर्णय की…

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर एका महिला कर्मचाऱ्याने आपला अनुभव शेअर केला आहे. ती ज्या कंपनीत काम करत होती त्या कंपनीने तिला भावाच्या लग्नाला जा किंवा नोकरीचा राजीनामा दे असे पर्यांय दिले होते.

लग्न की नोकरी? कंपनीची अजब ऑफर, महिलेने घेतला असा निर्णय की...
Job
| Updated on: Sep 06, 2025 | 6:27 PM
Share

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर एका महिला कर्मचाऱ्याने आपला अनुभव शेअर केला आहे. ती ज्या कंपनीत काम करत होती त्या कंपनीने तिला भावाच्या लग्नाला जा किंवा नोकरीचा राजीमाना दे असे पर्यांय दिले होते. मात्र या महिलेने नात्याला अधिक महत्व दिले आणि भावाच्या लग्नाला जाण्याचा निर्णय घेतला. या महिलेने आपला अनुभव सांगताना नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

महिलेची पोस्ट व्हायरल

एका महिलेने रेडिटवर आपला कंपनीबद्दलचा वाईट अनुभव सांगितला आहे. तिने आपल्या पोस्टला ‘मला कंपनीने भावाचे लग्न किंवा नोकरी असा पर्याय दिला होता, मी नाते निवडले. मी चुकीची आहे का? असे कॅप्शन दिले आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, नमस्कार मित्रांनो, मला तुमचे मत हवे आहे. मी गेल्या 4 वर्षांपासून एका कंपनीत काम करत आहे. मी कंपनीसाठी खूप जास्त मेहनत केली, नवीन लोकांना प्रशिक्षण दिले आणि नेहमीच कंपनीच्या प्रगतीला प्राधान्य दिले. काही दिवसांपूर्वी माझ्या सख्ख्य भावाचे लग्न जमले. हे लग्न अमेरिकेत होते. मी कंपनीला 3 आठवडे आधीच सांगितले होते की मला अमेरिकेला जाण्यासाठी 15 दिवसांची सुट्टी हवी आहे.

महिलेने पुढे लिहिले की, मी सुट्टी मागितल्यावर मला मिळालेले उत्तर अपेक्षित नव्हते. त्यांनी मला स्पष्टपणे सांगितले की लग्नाला जायचे असेल तर राजीनामा द्या. त्यावर मी सुट्टीचा कालावधी कमी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही मला सुटी मिळाली नाही. सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे मी 4 वर्षे मी तडजोड करत कंपनीसाठी काम केले. जेव्हा कंपनी अडचणीत होती तेव्हा मी कमी पगारावरही काम केले. जेव्हा 2 लोक नोकरी सोडून गेले तेव्हा मी त्यांचे कामही अतिरिक्त पगाराशिवाय केले. असे करुणही मला थोडीशीही सहानुभूती दाखवण्यात आली नाही.

कंपनीतील जवळजवळ प्रत्येकजण, अगदी माझा जुना बॉसही कंपनीचा दृष्टिकोन चुकीचा आहे असे म्हणत मला पाठिंबा दिला. माझ्याकडे दुसऱ्या कंपनीची ऑफर नसतानाही मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. सुदैवाने माझ्यावर कोणताही मोठा आर्थिक भार नाही. पण माझ्या मनात प्रश्न असा आहे की – मी योग्य काम केले का? नात्याला प्राधान्य देत गरजेच्या वेळी मला साथ न देणाऱ्या कंपनीला सोडण्याचा निर्णय योग्य आहे का?

सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

या महिलेची पोस्ट रेडिटवर व्हायरल झाली. नेटकऱ्यांनी कंपनीच्या वृत्तीवर टीका केली. एका युजरने म्हटले की, ‘माझे गुरू नेहमीच म्हणायचे की, प्रथम तुमच्या वैयक्तिक आयुष्याला प्राधान्य द्या, नोकरी त्यानुसार जुळवून घ्यावी. दुसऱ्याने लिहिले की, मी संपूर्ण पोस्ट वाचली नाही, फक्त शीर्षक पुरेसे आहे. तुम्ही योग्य निर्णय घेतला आहे. आणखी एकाने म्हटले की, ‘यातून एक मोठा धडा मिळतो, जर तुम्ही एकदा तडजोड केली तर कंपनी नेहमीच फायदा घेण्याचा प्रयत्न करेल.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.