AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोलापुरात ‘शरद मँगो’, 3 किलोच्या आंब्याला चक्क शरद पवारांचंच नाव; पेटंटही मिळालं

सोलापुरातील माढा तालुक्यातील अरन गावातील शेतकरी दत्तात्रय घाडगे यांनी आपल्या शेतात तीन किलो वजनाचा आंबा पिकवला आहे. या आंब्याला त्यांनी 'शरद मँगो' असे नाव दिले आहे. घाडगे यांनी विविध प्रकारच्या आंब्यांवर ग्राफ्टिंग करून आणि होमिओपॅथिक खतांचा वापर करून हा आंबा पिकवला आहे.

सोलापुरात 'शरद मँगो', 3 किलोच्या आंब्याला चक्क शरद पवारांचंच नाव; पेटंटही मिळालं
Sharad MangoImage Credit source: Social Media
| Updated on: Apr 22, 2025 | 7:28 PM
Share

सोलापुरातील माढा तालुक्यातील अरन गावच्या शेतकऱ्याने तर कमालच केली आहे. दत्तात्रय घाडगे नावाच्या या शेतकऱ्याने आपल्या शेतात आंब्यावर विविध प्रयोग करत तीन किलोचा आंबा पिकवला आहे. त्याने या आंब्याला चक्क ‘शरद मॅंगो’ असं नाव दिलं आहे. शरद पवार यांच्यावरी अतुट भक्तीमुळेच त्याने या आंब्याला शरद पवार यांचं नाव दिलं आहे. त्यामुळे हा आंबा पाहण्यासाठी सोलापुरात आजूबाजूच्या जिल्ह्यातूनही लोक येत असून घाडगे यांच्या आंब्याला मोठी मागणी आली आहे.

दत्तात्रय घाडगे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. या आंब्याचं वजन तीन किलो आहे. आमच्या शेतात विविध प्रकारचे आंबे लावले आहेत. केसर, झाडी आणि केळी याच्यावरही ग्राफ्टिंग प्रयोग केला आहे. ही शेती करण्यासाठी शरद पवार मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या योजनेचा आधार घेतला. या अनोख्या आंब्याला पेटंटही मिळाल्याचं दत्तात्रय घाडगे यांनी सांगितलं.

10 हजार आंबे

शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी फळबाग योजना राबवली होती. या योजनेच्या अंतर्गत घाडगे यांनी आठ एकर शेतात 10 हजार केसर आंब्याची रोपं लावली होती. ही रोपं चांगलीच मोठी झाली आहेत. आंब्याचं उत्पादनही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळेत घाडगे यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचं नाव या आंब्याला दिलं आहे.

तो प्रयोग यशस्वी

तीन किलोचा आंबा उगवण्यासाठी आम्ही एकाच रोपावर विविध प्रकारच्या आंब्यावर ग्राफ्टिंग केलं. यात केसर आंब्यावर विविध प्रकारचे प्रयोग केले. होमिओपॅथी खते आणि औषधांचा वापर केला. त्याचा यशस्वी वापर झाल्याने प्रयोग यशस्वी ठरला. देशात पहिल्यांदाच अडीच किलोचा आंबा उत्पादन झालं आहे. हा आंबा बारामतीतील कृषी महाविद्यालयातील शास्त्रज्ञांनाही दाखवण्यात आल्याचं घाडगे यांनी सांगितलं.

पेटंट मिळालं

माढा तालुक्यातील अरन गावच्या या शेतकऱ्याने तीन किलो वजनाचा नवीन आंबा उत्पादित केला आहे. आपल्या कल्पकतेतून त्याने हा आंबा उगवल्याने त्याने या आंब्याला शरद मँगो अर्थात शरद आंबा असे नाव दिलं आहे. विशेष म्हणजे घाडगे यांना या आंब्याचं पेटंटही मिळालं आहे.

Follow Us
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?