AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हे’ आएएस अधिकारी पहिल्या लग्नात झाले अपयशी; आता पुन्हा एकदा बोहल्यावर…

या आएएस अधिकाऱ्यांबद्दल सांगण्यात येत आहे की, हे आयएएस जोडपं येत्या काही दिवसांमध्येच लग्नबेडीत अडकणार आहेत. या कार्यक्रमामध्ये संबलपूरचे एसपी आणि सुवर्गपूरचे जिल्हा दंडाधिकारीही उपस्थित होते.

'हे' आएएस अधिकारी पहिल्या लग्नात झाले अपयशी; आता पुन्हा एकदा बोहल्यावर...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Feb 20, 2023 | 10:12 PM
Share

मुंबईः ओडिशातील दोन आयएएस अधिकाऱ्यांच्या लग्नाची चर्चा सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. खरं तर या दोन्ही आयएएस अधिकाऱ्यांचा घटस्फोट झाला असून आता ते लवकरच पुन्हा लग्न करणार आहेत. संबलपूरचे जिल्हाधिकारी आणि आयएएस अधिकारी अनन्या दास यांनी बालंगीरचे जिल्हाधिकारी चंचल राणा यांच्याशी संबलपूरमध्ये निवासस्थानी साखरपुडा केल्याचे सांगण्यात आले आहे. या दोन्ही आयएएस अधिकाऱ्यांनी मित्र, कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईकाच्या उपस्थितीतमध्येच त्यांनी पारंपरिक पद्धतीने एकमेकांना अंगठी घातली असल्याचे सांगण्यात आले आहे.

या आएएस अधिकाऱ्यांबद्दल सांगण्यात येत आहे की, हे आयएएस जोडपं येत्या काही दिवसांमध्येच लग्नबेडीत अडकणार आहेत. या कार्यक्रमामध्ये संबलपूरचे एसपी आणि सुवर्गपूरचे जिल्हा दंडाधिकारीही उपस्थित होते.

आयएएस चंचल राणा यांचे कुटुंबीयही या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी संबलपूरमध्ये आले होते. राणा आणि अनन्या यांनी या कार्यक्रमाच्या आधी एक दिवसापूर्वीच दागिन्यांच्या दुकानात जाऊन सोन्याची खरेदीही केल्याचे त्यांनी सांगितले.

आसामची असलेल्या अनन्या दासचे लग्न यापूर्वी कोरापुटचे कलेक्टर अब्दुल एम. अख्तर यांच्याबरोबर झाला होता. मात्र दोघांमधील मतभेदांमुळे त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.

तर चंचल राणा यांचा हा पहिला विवाह रायगडच्या कलेक्टर असलेल्या स्वधा देव सिंह यांच्याबरोबर झाला होता. या दोघांचे लग्नही जास्त काळ टिकले नव्हते.

आता चंचल आणि अनन्याने एकमेकांचा हात धरण्याचा निर्णय घेतला आहे. अनन्या दास 2015 च्या गुजरात केडरच्या आयएएस अधिकारी आहेत.

त्या कटक महानगरपालिकेच्या आयुक्तही होत्या. तर चंचल राणा यांनी एनआयटी सिलचरमधून शिक्षण घेतले असून ते 2014 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 2015 मधील टॉपर टीना दाबीदेखील त्यांच्या दुसऱ्या लग्नानंतर चर्चेत आल्या होत्या. त्यांचेही पहिले लग्न हे आयएएस अधिकारी अतहर खानबरोबर झाले होते. पण त्यांचा घटस्फोट झाला आणि त्यानंतर त्यांनी प्रदीप गावंडे या आयएएस अधिकाऱ्याबरोबर लग्न केले होते.

Follow Us
MNS शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड: मनसेचा भाजपवर आरोप
अंबरनाथमधील भाजप-मनसे राड्यावरुन मनसे नेते आक्रमक, गाडी तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न
Sharad Pawar | चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न; शरद पवार यांचा दावा
आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य...
Rahul Narwekar | आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य; सुप्रीम कोर्टात निर्णय....
फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची पुन्हा भारताला धमकी
‘सिंधूचं पाणी आमची रेड लाईन’; पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'-दिपके
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'- अभिजीत दिपके
जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन
Chandrashekhar Bawankule | जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन; चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली घोषणा, म्हणाले...
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीक नको’
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; प्रसाद लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीका नको’
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल : "शिंदेंच्या जीवावर खासदार
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल :
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: सामंतांवर हल्लाबोल
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: रोहित पवारांचा उद्योगमंत्री सामंतांवर हल्लाबोल