“देश अनिश्चिततेच्या गर्तेत”; ठाकरे गटाची राज्य आणि केंद्र सरकारवर सडकून टीका

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले होत. त्यानंतर शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर दावा सांगत शिंदे गटाने शिवसेना आपलीच असल्याचे सांगितले होते.

देश अनिश्चिततेच्या गर्तेत; ठाकरे गटाची राज्य आणि केंद्र सरकारवर सडकून टीका
Follow us
| Updated on: Feb 20, 2023 | 9:13 PM

अमरावतीः शिवसेना चिन्ह आणि पक्ष हे दोन्ही शिंदे गटाला मिळाले असल्याने ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत, विनायक राऊत यांच्यासह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार निशाणा साधला आहे. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारसह केंद्रावरही जोरदार निशाणा साधला आहे. अमरावतीमध्ये शिव जयंतीच्या निमित्ताने सुषमा अंधारे यांनी शिंदे गटासह भाजपवरही सडकून टीका केली आहे. यावेळी भाजपवर आणि शिंदे गटावर टीका करताना त्यांनी सध्याच्या काळात देश हा अनिश्चततेच्या गर्तेत सापडला असल्याची गंभीर टीका भाजपवर करण्यात आली आहे.

भाजपवर आणि शिंदे गटावर टीका करताना सुषमा अंधारे यांनी अंध भक्त म्हणत भाजप समर्थकांवरही त्यांनी टीका केली आहे.

जसा घासलेटवर रिक्षा चालवण्याचा प्रयोग होता. तसा देश अंध भक्तीवर चालवण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले होत. त्यानंतर शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर दावा सांगत शिंदे गटाने शिवसेना आपलीच असल्याचे सांगितले होते.

त्याविरोधात न्यायालयीन लढाईही लढली गेली. न्यायालयीन लढाई सुरू झाल्यानंतर पक्ष आणि चिन्ह या दोन्ही गोष्टी शिंदे गटाला मिळाल्यामुळे आताच्या काळात स्वायत्त यंत्रणांकडूनही चुना लागत असल्याचा गंभीर आरोपही सरकारवर केला आहे.

तर अमरावती दौऱ्यावर असलेल्या सुषमा अंधारे यांनी नवनीत राणा यांच्यावरही निशाणा साधला. त्यांच्यावर टीका करतान त्या म्हणाल्या की, मी मार्चमध्ये अमरावतीला येणार आहे, कारण मला नवनीत अक्काची गळा भेट घ्यायची असल्याचे सांगत त्यांना जोरदार टोला लगावला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नेत्यांचाही त्यांनी यावेळी समाचार घेतला. भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरुन टीका करताना त्या म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराज हे 18 पगड जातीचे राजे होते.

शिवाजी महाराज हे सर्व धर्म समभावाचे होते. तसेच शिवाजी महाराज यांनी मुहूर्त बघून कधी लढाया केल्याही नाहीत. सध्याच्या काळात शिवाजी महाराज यांच्याबद्दल आता अनेक नेत्यांचे प्रेम ओतू चालले आहे.

मात्र ज्यावेळी भगतसिंग कोशारीसारखी माणसं विषारी वक्तव्य करत होती. त्यावेळी हे प्रेम कुठं गेलं होते असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

शिवजयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल आग्राला गेले होते. मात्र मनी नाही भाव देवा मला पाव अशी अवस्था शिंदे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.