जगातलं एकमेव शहर जिथं मटण खाल्ल्यास भयंकर शिक्षा, नाव काढायलाही घाबरतात लोक; कारण वाचून बसेल धक्का!
जगातील एकमेव असे शहर आहे जेथे मांसाहार करण्यास बंदी आहे. हे शहर भारतात आहे. आता हे शहर नेमकं कोणतं? जाणून घ्या...

अनेक लोक असे आहेत ज्यांना दररोज मांसाहार करण्याची सवय असते. मांस किंवा मच्छी असल्याशिवाय काही लोकांचा आहारच पूर्ण होत नाही. अनेक ठिकाणी अगदी सहज मांस आणि मच्छी देखील मिळते. पण देशातील एक शहर असे आहे जिकडे मांसाहारवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. हा नियम मोडल्यामुळे तुम्हाला तुरुंगातही जावे लागू शकते. आता हे शहर कुठे आहे? तुम्ही कधी तेथे गेला आहात का? जाणून घ्या सविस्तर…
गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील पालिताना हे एक छोटेसे पण धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे शहर आहे. हे शहर आता केवळ भारतातीलच नव्हे, तर जगातील पहिले असे शहर ठरले आहे जिथे मांसाहार पूर्णपणे प्रतिबंधित आहे. येथे प्राण्यांची हत्या करणे, मांस किंवा अंडी यांची विक्री करणे आणि त्यांचे सेवन करणे यावर कायद्याने बंदी घालण्यात आली आहे.
जैन धर्मीयांसाठी पवित्र स्थान
पालिताना हे जैन धर्मीयांसाठी जगातील सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. शत्रुंजय डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या या शहरात ८०० पेक्षा जास्त भव्य जैन मंदिरे आहेत. या वैशिष्ट्यामुळे याला ‘मंदिरांचे शहर’ असेही म्हटले जाते. जैन धर्मातील अहिंसेच्या तत्त्वाचे पालन करण्यासाठी हे शहर ओळखले जाते.
बंदीमागील इतिहास आणि संघर्ष
ही बंदी अचानक लागू झालेली नाही. यामागे मोठा संघर्ष आहे:
२०१४ मधील आंदोलन: २०१४ मध्ये सुमारे २०० जैन मुनींनी शहरात होणारी प्राण्यांची हत्या थांबवण्यासाठी आमरण उपोषण केले होते.
कत्तलखाने बंद करण्याची मागणी: या आंदोलनात शहरातील सुमारे २५० कसाई दुकाने आणि कत्तलखाने बंद करण्याची मागणी करण्यात आली होती.
सरकारचा निर्णय: जैन समुदायाच्या धार्मिक भावनांचा आदर करत आणि शहराचे पावित्र्य राखण्यासाठी गुजरात सरकारने पालितानाला ‘मांसाहार मुक्त क्षेत्र’ (Meat-free Zone) घोषित केले.
पर्यटन आणि खानपान
पालितानामध्ये आता केवळ शुद्ध शाकाहारी भोजन मिळते. येथे येणारे पर्यटक आणि भाविक ढोकळा, खांडवी, फाफडा आणि कढी यांसारख्या प्रसिद्ध गुजराती पदार्थांचा आस्वाद घेतात. जैन धर्माच्या अनुयायांसाठी हे शहर ‘अहिंसेचे’ जिवंत उदाहरण बनले आहे.