AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर पोलिसांनी हात जोडले! नियम पाळा म्हणून सांगून थकले…

पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरही हसू येईल आणि कदाचित तुम्हालाही राग येईल.

अखेर पोलिसांनी हात जोडले! नियम पाळा म्हणून सांगून थकले...
not following traffic rulesImage Credit source: Social Media
| Updated on: Nov 13, 2022 | 6:09 PM
Share

वाहतुकीचे नियम प्रत्येकाने पाळावेत, अन्यथा आजकाल रस्ते अपघात किती वाढले आहेत, हे आपण पहात असालच. बहुतांश अपघात हे वाहतूक नियमांचे पालन न केल्याने होतात. लोक मर्यादेपेक्षा जास्त वेगाने गाडी चालवतात आणि अनेक जण हेल्मेटही वापरत नाहीत. अशा परिस्थितीत अपघात झाल्यास लोकांचे जीव धोक्यात येतात, हे उघड आहे. असे अनेक लोक तुम्ही पाहिले असतील, जे बाईकवर अनेक लोकांना एकत्र बसवून चालतात. यासंबंधित एक व्हिडिओ आजकाल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरही हसू येईल आणि कदाचित तुम्हालाही राग येईल.

खरंतर या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने आपल्यासोबत बाईकवर चार लोकांना बसवलेलं दिसून येतंय. त्याने हेल्मेटही घातलेलं नाही.

त्याला पाहून त्या पोलिसाने हात जोडले आणि अत्यंत विनम्रपणे चालत पोलीस स्टेशनला जाण्यास सांगितले. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या व्यक्तीने आपली पत्नी आणि तीन मुलांना बाईकवर कसं बसवलं आहे.

हे दृश्य पाहून त्या पोलिसाने हात जोडून त्या व्यक्तीला ‘कोणी उरले आहे का’, असे विचारले. यानंतर कुटुंब लहान असेल तर थोडी मोठी गाडी बनवली जाईल, असा चिमटा त्यांनी काढला.

मग त्या पोलिसाने दुचाकीवरील प्रवाशांची मोजणी केली आणि पुन्हा चिमटा काढला. यानंतर त्याने त्या व्यक्तीला पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले.

मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूरमध्ये ही घटना घडली. या घटनेशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @DevendraDube नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आलाय.

मात्र, दुचाकीवर ४-५ जण बसले आहेत. लोक अनेकदा नियमांची पायमल्ली करताना दिसतात, पण ते जोखमीचंही असू शकतं, हे त्यांना समजत नाही.

अशा परिस्थितीत अपघात होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे दोनपेक्षा जास्त लोक कधीही दुचाकीवर बसू नयेत याची काळजी लोकांनी नेहमी घ्यायला हवी.

Follow Us
द्राक्ष बागांना अवकाळीचा फटका, 60 टक्के पिक गेलं
द्राक्ष बागांना अवकाळीचा फटका, 60 टक्के पिक गेलं.
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.
मोठं संकट? वैजापूरमध्ये संध्याकाळी अचानक विमानाच्या घिरट्या...
मोठं संकट? वैजापूरमध्ये संध्याकाळी अचानक विमानाच्या घिरट्या....
अशोक खरात प्रकरणात नवी नावं समोर; संजय राऊतांची प्रतिक्रिया चर्चेत
अशोक खरात प्रकरणात नवी नावं समोर; संजय राऊतांची प्रतिक्रिया चर्चेत.
इराण-अमेरिका तणावावरून राऊतांचा ट्रम्पवर निशाणा; भाजपवरही जोरदार टीका
इराण-अमेरिका तणावावरून राऊतांचा ट्रम्पवर निशाणा; भाजपवरही जोरदार टीका.
भोंदूबाबा खरातला आमदार करायचं होतं? तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा काय?
भोंदूबाबा खरातला आमदार करायचं होतं? तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा काय?.
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.