AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nobel Prize: साहित्याचे नोबेल पारितोषिक! भारताचे सलमान रश्दी प्रमुख दावेदार, कोण आहेत सलमान रश्दी? त्यांच्या हत्येचा प्रयत्न का करण्यात आला?

सलमान रश्दी कोण आणि त्याच्या नावाची चर्चा का होतीये जाणून घेऊयात.

Nobel Prize: साहित्याचे नोबेल पारितोषिक! भारताचे सलमान रश्दी प्रमुख दावेदार, कोण आहेत सलमान रश्दी? त्यांच्या हत्येचा प्रयत्न का करण्यात आला?
Salman Rushdie NobelImage Credit source: Social Media
| Updated on: Oct 05, 2022 | 12:47 PM
Share

भारतीय कादंबरीकार आणि साहित्यिक सलमान रश्दी यांचं नाव साहित्याच्या नोबेल पुरस्काराबद्दल चर्चेत आहे. यावेळी सलमान रश्दी यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार मिळू शकतो, असा दावा केला जातोय. 5 ऑक्टोबरला, आज साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर होणार आहे. सलमान रश्दी कोण आणि त्याच्या नावाची चर्चा का होतीये जाणून घेऊयात.

सलमान रश्दी हे लंडन मध्ये राहणारे भारतीय वंशाचे साहित्यिक आहेत. जन्म – 19 जून 1947 मुंबई, महाराष्ट्र, भारत. सलमान हे मुस्लिम कुटुंबातील आहेत.

सलमान रश्दी आपल्या पुस्तकांच्या माध्यमातून लोकांच्या अभिव्यक्ती आणि स्वातंत्र्यासाठी आवाज उठवत आहेत. त्यांच्या पुस्तकांमुळे ते चर्चेत आहेत.

काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. हा हल्ला त्यांनी लिहिलेल्या त्यांच्या ‘सॅटेनिक वर्सेज’ या वादग्रस्त पुस्तकामुळे करण्यात आला होता.

सलमान रश्दी यांनी आतापर्यंत अनेक महान नोबेल लिहिले आहेत. रश्दी यांनी 1988 साली लिहिलेलं ‘सॅटनिक वर्सेज’ हे त्यांचे चौथे नोबेल होय.

हे नोबेल पैगंबर महंमद पैगंबर यांच्या जीवनातून प्रेरित आहे. रश्दी यांच्या या पुस्तकावर अनेकांनी इस्लामी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला होता.

इराणमध्ये या पुस्तकावर बंदी घालण्यात आली. या पुस्तकावरून न्यूयॉर्कमध्ये त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. यापूर्वी ‘सॅटेनिक वर्सेज’साठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय.

साहित्य विश्वात सलमान रश्दी यांचं वेगळं स्थान आहे. सलमान रश्दी यांनी एकूण 14 कादंबऱ्या लिहिल्या आहेत.

ग्रिमस, मिडनाइट्स चिल्ड्रन, लज्जा, द सॅटनिक व्हर्सेज, ॲरॉन अँड द सी ऑफ स्टोरीज, द मूर्स लास्ट सिसा, द ग्राउंड बिनिथ हिअर फीट, फ्यूरी, शालिमार द क्लाउन, द एन्चॅन्रेस ऑफ फ्लोरेन्स, लुका अँड द फायर ऑफ लाइफ, टू इयर्स एइट मंथ्सअँड ट्वेंटी-एट नाइट्स, द गोल्डन हाउस आणि क्विचोटे ही त्यांची प्रमुख पुस्तके आहेत.

त्यांच्या ‘मिडनाइट चिल्ड्रन’ या प्रसिद्ध पुस्तकासाठी त्यांना प्रतिष्ठित “आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार” हा पुरस्कार मिळालाय.

साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळवणारे सलमान रश्दी रवींद्र टागोरांनंतरचे पहिले भारतीय वंशाचे लेखक होऊ शकतात असं द गार्डियनच्या वृत्तात म्हटले आहे.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.