AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Titanic Ship: अजूनही न उलगडलेली टायटॅनिकशी संबंधित काही रहस्ये!

Titanic Ship: या अपघातात दीड हजारांहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला. ही घटना अटलांटिक महासागरात घडली. टायटॅनिकबद्दल एक गोष्ट सांगितली गेली की ते जगातलं न बुडणारं जहाज होतं, परंतु ते त्याच्या पहिल्याच प्रवासादरम्यान बुडाले.

Titanic Ship: अजूनही न उलगडलेली टायटॅनिकशी संबंधित काही रहस्ये!
Titanic ShipImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jul 29, 2022 | 5:24 PM
Share

आजही टायटॅनिकचा (Titanic) उल्लेख आला की त्याच्या अपघाताबद्दल पण बोललं जातं. असं म्हटलं जातं, टायटॅनिक बुडलं त्या वेळी परिस्थिती कशी असेल असा प्रश्न अनेकदा लोकांना पडतो. खरं तर त्या दुर्दैवी रात्री घडलेला टायटॅनिकचा अपघात इतका धोकादायक होता की त्याचे अवशेष शोधण्यासाठी सुमारे 75 वर्षे लागली. आतापर्यंत या घटनेबाबत जगभरातील शास्त्रज्ञांनी बरेच संशोधन केले आहे, पण अजूनही काही रहस्ये अटलांटिक महासागरात (Atlantic Sea) दडलेली आहेत, जी रहस्य अजूनही उघड झालेली नाहीत. सुमारे 110 वर्षांपूर्वी म्हणजे 16 एप्रिल 1912च्या रात्री टायटॅनिकचा अपघात (Titanic Accident) झाला होता. हिमनगाशी त्याची धडक झाली होती. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, त्यावेळी टायटॅनिक सुमारे 41 किलोमीटर प्रतितास वेगाने प्रवास करत होते. ते इंग्लंडमधील साऊथॅम्पटनहून अमेरिकेतील न्यूयॉर्कला जात होता. 16 एप्रिलच्या रात्री जहाजावरील सर्व प्रवासी झोपलेले असताना टायटॅनिक हिमनगाला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात दीड हजारांहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला. ही घटना अटलांटिक महासागरात घडली. टायटॅनिकबद्दल एक गोष्ट सांगितली गेली की ते जगातलं न बुडणारं जहाज होतं, परंतु ते त्याच्या पहिल्याच प्रवासादरम्यान बुडाले.

टायटॅनिकशी संबंधित काही रहस्ये, जे आजही उलगडलेले नाहीत

1. जगातील कधीही न बुडणारे जहाज बुडाले कसे?

जगातील सर्वात मोठे जहाज असलेल्या टायटॅनिकबद्दल एक गोष्ट सांगितली गेलीये की, ते कधीही न बुडणारे जहाज होते. मात्र, ते जहाज बनवताना टायटॅनिकची निर्मिती करण्यात आली, त्यात काही खास प्रकारचे डबे बांधले गेले, जेणेकरून जरी जहाज बुडण्याच्या स्थितीत असलं तरी ते ह्या डब्ब्यांमुळे बुडणार नाही असं एका तज्ज्ञाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या बीबीसीच्या अहवालात म्हटले आहे. मात्र, या संदर्भात जहाजाची अशी रचना करूनही ती कशी बुडाली याचा शोध शास्त्रज्ञांना घेता आलेला नाही. जहाजाच्या मुख्य भागाला अर्ध्या लांबीपर्यंत छिद्र पडल्याने टायटॅनिक जहाज बुडण्यापासून वाचू शकले नाही, असे अनेक सिद्धांत सांगतात.

2. ब्लू बँडने हजारो लोकांचा बळी घेतला होता का?

रिपोर्ट्सनुसार, अटलांटिक महासागरात जेव्हा हे जहाज भरधाव वेगाने धावते तेव्हा हा सन्मान दिला जातो, ज्याला ब्लू बँड मिळतो. टायटॅनिकही याच सन्मानास पात्र होते, त्यामुळेच ब्ल्यू बँड मिळवण्यासाठी अटलांटिकमध्ये त्याचा वेग वाढवण्यात आला, असा दावा अनेक अहवालांत करण्यात आला आहे. टायटॅनिक साऊथॅम्प्टन ते न्यूयॉर्क या आपल्या पहिल्या प्रवासाला निघाला होता, जो तो पूर्ण करू शकला नाही. अशा परिस्थितीत टायटॅनिकच्या वेगावरही प्रश्न उपस्थित केले जातात.

3. लोकांच्या मृत्यूचे हेच कारण आहे का?

अटलांटिकमध्ये झालेल्या त्या भीषण अपघातात 1500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे अनेक अहवालांत म्हटले आहे. इतक्या लोकांच्या मृत्यूचे एक मुख्य कारण म्हणजे त्या काळात लाइफ बोटींची संख्या कमी होणे आणि प्रवाशांसाठी केलेली सुरक्षा व्यवस्था. इतक्या लोकांच्या मृत्यूबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे अद्याप कळू शकलेली नाहीत.

4. टायटॅनिक वेगाने अपघाताचे कारण आहे का?

टायटॅनिकच्या कॅप्टन स्मिथवर असाही आरोप होता की, त्याला लवकरात लवकर अटलांटिक पार करायचे आहे, त्यामुळेच तो जहाज वेगाने नेत होता. त्याचबरोबर कॅप्टन स्मिथ यांना लवकरात लवकर कोळसा संपवायचा असल्याने त्यांनी जहाजाचा वेग वाढवला होता, अशी माहिती अनेक अहवालांमध्ये देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत टायटॅनिकच्या वेगावर आणि कॅप्टन स्मिथवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

5. टायटॅनिकचे दोन तुकडे कसे झाले?

टायटॅनिकचे टू-पीस ब्रेकअप हा स्वतःच एक आश्चर्यकारक विषय आहे. त्यामुळे टायटॅनिकचे दोन तुकडे कशामुळे झाले, याचा शोध आजवर जगभरातील अनेक तज्ज्ञांना घेता आलेला नाही.

6. दुर्बीण असती तर दुर्घटना टळली असती का?

टायटॅनिक अपघाताचे महत्त्वाचे कारण म्हणजे क्रूसोबत दुर्बिण नसणे हेही सांगण्यात आले आहे. टायटॅनिकसारख्या महाकाय जहाजाच्या क्रू मेंबर्स आणि कॅप्टन्सकडे दुर्बिण का नव्हती, असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. अनेक अहवालांमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, जर क्रूकडे दुर्बिण असती, तर त्यांनी धोका खूप आधीच वाफवला असता, ज्यामुळे इतका मोठा अपघात टळला असता आणि हजारो लोकांचे प्राण वाचले असते.

अशी अनेक रहस्ये आहेत ज्यांची रहस्ये अद्याप उघडलेली नाहीत.

Follow Us
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......