AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Airplane Color: विमानाचा रंग पांढराच का असतो? सफेदी की चमकान क्यू? कधीही लक्षात न आलेल्या प्रश्नाचं उत्तर

Airplane Color: प्रत्येक एअरलाइन्स कंपनी वेगवेगळ्या रंगात विमानाचे ब्रँडिंग आणि टॅगलाईनसह इतर गोष्टी करू शकते, परंतु ते जहाजाचा मूळ रंग पांढरा ठेवतात असं का जाणून घेऊ...

Airplane Color: विमानाचा रंग पांढराच का असतो? सफेदी की चमकान क्यू? कधीही लक्षात न आलेल्या प्रश्नाचं उत्तर
airplane Image Credit source: Social Media
| Updated on: Jul 30, 2022 | 11:09 AM
Share

काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला लक्षात येत नाहीत. घाईगडबडीत म्हणा किंवा त्या गोष्टीही तशा पटकन लक्षात येण्यासारख्या नसतात त्यामुळे कदाचित त्या आपल्या नजरेतून सुटून जातात. आता बघा ना इतक्या दिवस आपल्या कधी लक्षात आलंय का की विमानाचा  रंग (Airplane Color), प्रवासी विमानाचा रंग बरेचदा पांढराच असतो? नाही. काही विमान कंपन्या सोडल्या तर सगळीच विमानं पांढऱ्या रंगाची असतात. एकवेळ त्या विमानावर टॅग, डिझाईन वेगळ्या रंगाची असेल पण त्याचा मूळ रंग पांढराच असतो. असं का? एखादे विमान आकाशात उडताना तुम्ही अनेकदा पाहिले असेल. अनेकदा तुम्ही त्यात बसून प्रवासही केला असेल. कधी लक्षात आले आहे का की बहुतेक विमाने पांढऱ्या रंगाची का असतात? शेवटी, काही जहाजे वगळता बहुतेक विमाने पांढऱ्या रंगाची असण्याचे कारण काय आहे? जर तुम्हाला याबद्दल माहिती नसेल तर आज आम्ही तुम्हाला यामागचं कारण सांगू. प्रत्येक एअरलाइन्स कंपनी (Airlines Company) वेगवेगळ्या रंगात विमानाचे ब्रँडिंग आणि टॅगलाईनसह इतर गोष्टी करू शकते, परंतु ते जहाजाचा मूळ रंग पांढरा (Airplane In White Color) ठेवतात असं का जाणून घेऊ…

या कारणांमुळे विमानाचा रंग पांढरा ठेवला जातो

1. विमानाचा रंग पांढरा ठेवण्याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे पांढरा रंग सूर्यप्रकाश परावर्तीत (रिफ्लेक्ट) करतो, ज्यामुळे विमानावर पडल्यानंतर सूर्यप्रकाश उसळतो. अशा परिस्थितीत निळ्या आणि तेजस्वी आकाशातही विमान सहज दिसते. शिवाय सूर्यप्रकाशाच्या परावर्तनामुळे विमानाचा पृष्ठभाग गरम होत नाही, त्यामुळे जहाजाच्या आतील प्रवाशांना उष्णताही जाणवत नाही. त्याचबरोबर बाकीचे इतर रंग सूर्यप्रकाश शोषून घेतात, त्यामुळे विमानप्रवासातील लोकांना अस्वस्थ वाटू लागते.

2. तुम्हाला माहिती असेलच, उंचावर विमान उडवल्यामुळे त्याला अनेक प्रकारच्या वातावरणीय परिस्थितीला तोंड द्यावे लागते. इतक्या परिस्थितीतून गेल्यानंतरही विमानाचा रंग मलिन होत नाही, त्यामुळे विमानाचा रंग पांढराच ठेवला जातो. याशिवाय रंगाचा रंगरंगोटी न झाल्याने विमानाचे सौंदर्यही टिकून राहते.

3. विमानाचा रंग पांढरा असल्यामुळे त्यावरील कोणत्याही प्रकारचे नुकसान, तडे इत्यादी सहज शोधता येतात. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही याचा खूप फायदा होतो. अनेकदा असे दिसून आले आहे की, उड्डाण आणि लँडिंगच्या वेळी विमानाला धडकणाऱ्या पक्ष्यांमुळे अनेक प्रकारचे अपघात होतात. अशा परिस्थितीत हे अपघात टाळण्यासाठी विमान कंपन्या विमानाचा रंग पांढऱ्या रंगाने रंगवतात. यामागचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे विमानाच्या पांढऱ्या रंगामुळे त्याची दृश्यता चांगली राहते, त्यामुळे पक्ष्यांना दुरूनच विमानाचा अंदाज येतो आणि मोठे अपघात टळतात.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.