AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ग्राहक न्यायालयाचा मोठा निर्णय, ट्रेनमध्ये सामान चोरीला गेल्यास रेल्वे जबाबदार, द्यावी लागेल भरपाई

ग्राहक आयोगाने म्हटले आहे की रेल्वे प्रवासी आणि त्यांच्या सामानाची सुरक्षा ही रेल्वे प्रशासनाची जबाबदारी आहे.

ग्राहक न्यायालयाचा मोठा निर्णय, ट्रेनमध्ये सामान चोरीला गेल्यास रेल्वे जबाबदार, द्यावी लागेल भरपाई
RAILWAYImage Credit source: socialmedia
| Updated on: Apr 10, 2023 | 3:29 PM
Share

नवी दिल्ली :  रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय चंदीगड राज्य ग्राहक आयोगाने दिला आहे. जर तुम्ही आरक्षित डब्यातून प्रवास करीत असाल आणि तुमचे सामान चोरीला गेले तर चोरीला गेलेल्या वस्तूची भरपाई रेल्वेला करावी लागेल असा निकाल ग्राहक आयोगाने दिला आहे. ट्रेनमध्ये झालेल्या पर्स स्नॅचिंगच्या घटनेला रेल्वेला जबाबदार ठरवित प्रवाशाला हरविलेल्या वस्तूच्या किंमती इतका मोबदला देण्याचे आदेश ग्राहक आयोगाने दिले आहेत. तसेच प्रवाशाला झालेल्या मन:स्तापाबद्दल 50 हजार रूपयांची नुकसान भरपाई द्यावी असेही आयोगाने म्हटले आहे.

चंदीगड येथील सेक्टर – 28 मध्ये राहणाऱ्या रामबीर यांच्या तक्रारीवर ग्राहक न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. रामबीर आणि त्यांची पत्नी रेल्वेने प्रवास करीत असताना त्यांच्या पत्नीची पर्स चोरट्याने लांबीवली होती. त्या पर्समध्ये मौल्यवान ऐवज आणि सामान होते. रामबीर आपल्या कुटुंबियांसोबत चंदीगडहून दिल्ली जात होते. रामबीर यांनी जिल्हा ग्राहक न्यायालयात रेल्वे विरोधात दावा दाखल केला. तेथे त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. मग त्यांनी या निर्णयाविरोधा राज्य ग्राहक आयोगाकडे दाद मागितली.

आरक्षित डब्यात फिरत होते संशयित

रामबीर यांनी गोवा संपर्क क्रांती ट्रेनचे तिकीट ऑनलाईन बुक केले होते. 5 नोव्हेंबर 2018 रोजी ट्रेन जेव्हा चंदीगडला रवाना होत होती, त्यावेळी आरक्षित कोचमध्ये संशयित लोक फिरत होते. त्यांनी यासंदर्भात तिकीट तपासनीसांना कल्पना दिली. परंतू त्याच्याकडे कोणी लक्ष दिले नाही. अंबाला स्टेशन येताच त्यांच्या पत्नीची पर्स खेचून चोरटे चालत्या ट्रेनमधून उडी मारून पळाले.

1.08 लाख रूपये रेल्वेला द्यावे लागणार

राज्य ग्राहक आयोगाने रेल्वेला दोषी ठरवित ट्रेनमध्ये प्रवासी आणि त्यांच्या सामानाची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असल्याचे म्हटले. आयोगाने त्याची चोरीला गेलेल्या पर्सचे 1.08 लाख रूपये आणि झालेल्या मन:स्तापासाठी 50 हजार रूपये देण्याचे आदेश दिले. यापूर्वी अनेक वेळा प्रवाशाचे सामान चोरी झाल्याच्या प्रकरणात रेल्वेला जबाबदार ठरविण्यात आले आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.