AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIC : योजनाच जोरदार! असे मिळवा 22 लाख

LIC : एलआयसीच्या या योजनेत जोरदार मिळेल परतावा, असा होईल फायदा

LIC : योजनाच जोरदार! असे मिळवा 22 लाख
परतावा जोरदार
| Updated on: Jan 27, 2023 | 10:05 PM
Share

नवी दिल्ली : आजच्या युगात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतु, भारतीय जीवन विमा महामंडळावर (LIC) अनेक लोकांचा अद्यापही भरोसा कायम आहे. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी एलआयसी वेळोवेळी अनेक आकर्षक योजना घेऊन येते. आता आपण एलआयसीच्या कमी गुंतवणुकीत जास्त फायदा देणाऱ्या योजनेची माहिती घेऊयात. एलआयसीची धन संचय पॉलिसी (LIC Dhan Sanchay Scheme) ही अशीच एक योजना आहे. यामध्ये हमखास परतावा मिळतो. सोबतच इतर फायदेही मिळतात. एलआयसीच्या योजनेत गुंतवणुकीसोबतच विम्याचेही संरक्षण मिळते.

LIC धन संचय प्लॅन एक नॉन लिंक्ड, नॉन पार्टिसिपेटिंग, स्वतंत्र बचत विमा योजना आहे. या योजनेत बचतीसोबतच जीवन विम्याचा लाभही मिळतो. या पॉलिसीत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळते. तर योजनेतील निश्चित फायदे आणि अनुषांगिक लाभ ही हमखास देण्यात येतात.

एलआयसीच्या या योजनेत गुंतवणूकदाराला गुंतवणुकीचे चार पर्याय मिळतात. प्लॅन ए आणि बी अंतर्गत 3,30,000 रुपयांचा सम अॅश्युर्ड, प्लॅन सी अंतर्गत 2,50,000 रुपयाची किमान सम अॅश्युर्डचे संरक्षण, प्लॅन डी अंतर्गत 22,00,000 रुपयांचा सम अॅश्युर्ड संरक्षण मिळते.

या योजनेत वयाची अट आहे. योजनेत 3 वर्षांच्या किमान वयाची अट आहे. वयाची कमाल अट प्लॅनमध्ये वेगवेगळी आहे. प्लॅन ए आणि बीची कमाल वयाची अट 50 वर्ष, प्लॅन सी अंतर्गत 65 वर्षे आणि डी साठी 40 वर्षाची कमाल मर्यादा आहे.

ही पॉलिसी तुम्ही 5, 10 आणि 15 वर्षांसाठी खरेदी करु शकता. जितक्या वर्षांसाठी या योजनेत गुंतवणूक कराल, त्यानंतर तितक्या वर्षासाठी उत्पन्न मिळेल. म्हणजे 5 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर पुढील 5 वर्षांसाठी नियमीत कमाई होईल.

या योजनेत कमीतकमी 30000 रुपयांची वार्षिक गुंतवणूक करता येते. जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा नाही. या योजनेत तुम्हाला कर्ज ही मिळते. या योजनेत गुंतवणूक करायची असल्यास तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने पॉलिसी खरेदी करता येते.

Follow Us
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा.
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली.
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा.