AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIC : योजनाच जोरदार! असे मिळवा 22 लाख

LIC : एलआयसीच्या या योजनेत जोरदार मिळेल परतावा, असा होईल फायदा

LIC : योजनाच जोरदार! असे मिळवा 22 लाख
परतावा जोरदार
| Updated on: Jan 27, 2023 | 10:05 PM
Share

नवी दिल्ली : आजच्या युगात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतु, भारतीय जीवन विमा महामंडळावर (LIC) अनेक लोकांचा अद्यापही भरोसा कायम आहे. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी एलआयसी वेळोवेळी अनेक आकर्षक योजना घेऊन येते. आता आपण एलआयसीच्या कमी गुंतवणुकीत जास्त फायदा देणाऱ्या योजनेची माहिती घेऊयात. एलआयसीची धन संचय पॉलिसी (LIC Dhan Sanchay Scheme) ही अशीच एक योजना आहे. यामध्ये हमखास परतावा मिळतो. सोबतच इतर फायदेही मिळतात. एलआयसीच्या योजनेत गुंतवणुकीसोबतच विम्याचेही संरक्षण मिळते.

LIC धन संचय प्लॅन एक नॉन लिंक्ड, नॉन पार्टिसिपेटिंग, स्वतंत्र बचत विमा योजना आहे. या योजनेत बचतीसोबतच जीवन विम्याचा लाभही मिळतो. या पॉलिसीत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळते. तर योजनेतील निश्चित फायदे आणि अनुषांगिक लाभ ही हमखास देण्यात येतात.

एलआयसीच्या या योजनेत गुंतवणूकदाराला गुंतवणुकीचे चार पर्याय मिळतात. प्लॅन ए आणि बी अंतर्गत 3,30,000 रुपयांचा सम अॅश्युर्ड, प्लॅन सी अंतर्गत 2,50,000 रुपयाची किमान सम अॅश्युर्डचे संरक्षण, प्लॅन डी अंतर्गत 22,00,000 रुपयांचा सम अॅश्युर्ड संरक्षण मिळते.

या योजनेत वयाची अट आहे. योजनेत 3 वर्षांच्या किमान वयाची अट आहे. वयाची कमाल अट प्लॅनमध्ये वेगवेगळी आहे. प्लॅन ए आणि बीची कमाल वयाची अट 50 वर्ष, प्लॅन सी अंतर्गत 65 वर्षे आणि डी साठी 40 वर्षाची कमाल मर्यादा आहे.

ही पॉलिसी तुम्ही 5, 10 आणि 15 वर्षांसाठी खरेदी करु शकता. जितक्या वर्षांसाठी या योजनेत गुंतवणूक कराल, त्यानंतर तितक्या वर्षासाठी उत्पन्न मिळेल. म्हणजे 5 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर पुढील 5 वर्षांसाठी नियमीत कमाई होईल.

या योजनेत कमीतकमी 30000 रुपयांची वार्षिक गुंतवणूक करता येते. जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा नाही. या योजनेत तुम्हाला कर्ज ही मिळते. या योजनेत गुंतवणूक करायची असल्यास तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने पॉलिसी खरेदी करता येते.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.