AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIC Jeevan Shanti Policy : टेन्शन छूमंतर! एकाच मृत्यू झाल्यास दुसऱ्याला मिळणार पेन्शन

LIC Jeevan Shanti Policy : एलआयसीच्या या योजनेत गुंतवणूकदारांना मोठा फायदा होईल.

LIC Jeevan Shanti Policy : टेन्शन छूमंतर! एकाच मृत्यू झाल्यास दुसऱ्याला मिळणार पेन्शन
| Updated on: Jan 22, 2023 | 9:10 PM
Share

नवी दिल्ली : एलआयसीच्या न्यू जीवन शांती योजनेत (LIC New Jeevan Shanti Policy) गुंतवणूक केल्यास निवृत्तीनंतरच्या आयुष्याची काळजी मिळेल. गुंतवणूकदारांना उतारवयात पेन्शन (Pension) सुरु झाल्याने त्यांच्या औषधांचा आणि इतर खर्च भागेल. या योजनेत तुम्हाला अल्प गुंतवणुकीत चांगला परतावा मिळेल. भारतीय आयुर्विमा महामंडळाने न्यू जीवन शांती योजनेत नुकतीच सुधारणा केली आहे. त्यामुळे या 5 जानेवारीपासून योजनेत सहभागी होणाऱ्या गुंतवणूकदारांना (Investors) या पॉलिसीवर अधिक व्याज मिळेल.

या योजनेत गुंतवणुकीचे अनेक फायदे आहेत. आता विमाधारकांना या योजनेत प्रति 1,000 रुपयांवर 3 ते 9.75 रुपयांपर्यंत इन्सेटिंव मिळेल. खरेदी किंमत आणि निश्चित कालावधी आधारे इन्सेटिंव मिळते. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी एलआयसीने खास सवलत दिली आहे.

या महिन्यात एलआयसीने खरेदी मूल्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यासाठी खास सवलत दिली. त्यानुसार, प्रति 1,000 रुपयांवर 3 रुपये ते 9.75 रुपयांचा इन्सेंटिंव देण्याचा निर्णय घेण्यात आला. अर्थात इन्सेटिंव हा योजनेच्या कालावधीवर अवलंबून आहे.

ही योजना गुंतवणूकदार ऑनलाईनसह ऑफलाईन ही खरेदी करता येते. एलआयसीची जीवन शांती (LIC Jeevan Shanti Policy) ही मोठी वार्षिक योजना आहे. यामध्ये व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबियांना फायदा होतो.

या योजनेत 30 ते 79 वर्षापर्यंतचा कोणताही भारतीय नागरीक ही पॉलिसी खरेदी करु शकतो. या योजनेत किमान 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. पॉलिसी खरेदी केल्यानंतर तुमचा विचार बदलल्यास पॉलिसी सरेंडर करता येते. या पॉलिसीच्या आधारावर तुम्हाला कर्ज ही मिळते.

या योजनेनुसार, एकल पर्यायामध्ये डिफर्ड अॅन्युइटीच्या बाबतीत, तुम्हाला 10 लाख रुपयांची पॉलिसी खरेदी केल्यास 11,192 रुपये मासिक पेन्शन मिळते. तर कम्युनिटी लाईफसाठी मासिक पेन्शन 10,576 रुपये मिळेल.

एलआयसी योजनेत सदस्याचा मृत्यू झाल्यास, त्यासंबंधीचा लाभ मिळतो. ज्या व्यक्तीने या योजनेत गुंतवणूक करेल, त्याच्या मृत्यूनंतर, त्याचे कुटुंब आणि वारसदाराला पेन्शनसह इतर अनेक फायदे होतात.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत