AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किरकोळ महागाईनं गेल्या 8 महिन्यांच्या रेकॉर्ड तोडला! वाढत्या किंमतींनी सर्वसामान्यांचा खिसा फाडला

Retail Inflation : कच्च्या तेलाचच्या आणि खाण्याच्या गोष्टी महागल्याचा परिणाम इतर गोष्टींच्या दरांवरही थेट झाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे महागाई दर वाढत असल्याचं बोललं जातंय.

किरकोळ महागाईनं गेल्या 8 महिन्यांच्या रेकॉर्ड तोडला! वाढत्या किंमतींनी सर्वसामान्यांचा खिसा फाडला
वाढत्या महागाईत चिंता वाढवणारी बातमीImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Mar 14, 2022 | 9:13 PM
Share

मुंबई : आधी कोरोना महामारी (Corona Pandemic) आणि त्यानंतर सुरु असलेल्या जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांच्या खिशाला अधिकच कात्री बसू लागली आहे. फेब्रुवारी महिन्यात किरकोळ महागाईचा दर (Retail Inflation) हा 6.07 टक्के इतक्या विक्रमी स्तरावर पोहोचला आहे. हा आतापर्यंत गेल्या आठ महिन्यातला सर्वाधिक महागाईचा दर असल्याचं मसोर आलं आहे. आरबीआयनं (Reserve Bank of India) जारी केलेल्या महागाई स्तराच्या सलग दुसऱ्या महिन्यात किरकोळ महागाईनं गाठलेला स्तर हा सगळ्यांसाठीच चिंतेचा विषय ठरतोय. खाण्याच्या वस्तू महागल्या असून त्याचा परिणाम सर्वसामान्यांसोबतच सगळ्यांना बसू लागला आहे. सीपीआयच्या आधारे याबाबत अधिक स्पष्ट आकडेवारी जारी करण्यात आली आहे. फेब्रुवारी 2021मध्ये किरकोळ महागाईचा दर हा 5.03 टक्के इतका होता. तर जानेवारी 2022 मध्ये हाच दर 6.01 टक्क्यांपर्यंत पोहोचला. दरम्यान, फेब्रुवारी महिन्यातही यात वाढ होऊन आता किरकोळ महागाई ही 6.07 टक्क्यांवर जाऊन पोहोचली आहे.

दरम्यान, फेब्रुवारीमध्ये घाऊक महागाई ही 13.11 टक्क्यांवर पोहोचली असल्याचं सरकारच्या डब्ल्यूपीआय डेटामधून समोर आलं. कच्च्या तेलाचच्या आणि खाण्याच्या गोष्टी महागल्याचा परिणाम इतर गोष्टींच्या दरांवरही थेट झाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे महागाई दर वाढत असल्याचं बोललं जातंय. दरम्यान, अल्पशा प्रमाणात खाद्यपदार्थांच्या किंमतीत घट झाली असल्याचंही सांगितलं जातंय.

एनएसओतर्फे जारी करण्यात आलेल्या डेटानुसार खाद्यपदार्थांच्या किंमती या 5.89 टक्क्यांनी वाढल्या आहेत. महागाईचा हा जर जानेवारीच्य तुलनेत जास्त आहे. जानेवारीमध्ये 5.43 टक्क्यांनी खाद्यपदार्थांच्या किंमती वाढल्या होत्या.

कोणत्या गोष्टीमध्ये किती वाढ?

  1. धान्य 3.95 टक्क्यांनी महागलं
  2. मांस-मच्छी 7.54 टक्क्यांनी महाग
  3. भाज्या 6.13 टक्क्यांनी महाग
  4. मसाल्यांची 6.09 टक्क्यांनी दरवाढ
  5. फळांचा महागाई दर 2.26 टक्के
  6. तेल आणि इतर दराला अल्पसा दिलासा, महागाई दर 9.32 वरुन 8.73 टक्क्यांवर

सीपीआय म्हणजे काय?

सीपीआय म्हणजे कंझ्यूमर प्राई इंडेक्स. या द्वारे सामान आणि सेवेच्या किरकोळ बाजारातील किंमती नेमक्या किती आहे, त्यांचे दर किती वधारले आहेत किंवा घटले आहेत, याचा अभ्यास आणि त्यातील तुलना याद्वारे काढली जाते. आरबीआय अर्थव्यवस्थेत किंमती स्थिर ठेवण्यासाठी सीपीआयच्या आकड्यांचाही विचार करतं. सीपीआयमध्ये एका विशेष कमोडिटीसह किरकोळ बाजारातील किंमती काय आहेत, याचा आढावा घेतला जातो. शहरी, ग्रामीण आणि देशभरातील बाजारांतील किंमतींचे स्तर याचा अभ्यास या इंडेक्समध्ये केला जातो.

संबंधित बातम्या :

Maggie Price Hike : बच्चे कंपनीची आवडती मॅगी महागली, नवे दर लागू, वाढत्या महागाईचे चटके सुरुच

शेअर बाजारात 900 अंकांची वाढ, गुंतवणूकदारांच्या जिवात जीव! पण रुपयांचं मूल्य आणखी घसरल्यानं चिंता

कच्च्या तेलाच्या वाढत्या भावाचा प्रवाशांना फटका; विमान प्रवास महागला, तिकिटांच्या दरामध्ये 15 ते 30 टक्क्यांची वाढ

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.