AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! शिवसेना विलिनीकरणावर अब्दुल सत्तारांचे खळबळजवक वक्तव्य, थेट म्हणाले...

मोठी बातमी! शिवसेना विलिनीकरणावर अब्दुल सत्तारांचे खळबळजवक वक्तव्य, थेट म्हणाले…

| Updated on: Jun 03, 2026 | 1:23 PM
Share

शिवसेना पक्षाचे आमदार तथा माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकताच टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. या संवादात त्यांनी अनेक विषयांवर सुचक वक्तव्य केले. ते नेमकं काय म्हणाले वाचा...

शिवसेना पक्षाचे आमदार तथा माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकताच टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. या संवादात त्यांनी अनेक विषयांवर सुचक वक्तव्य केले. ते नेमकं काय म्हणाले वाचा…

अलीकडेच अब्दुल सत्तार यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यानंतर त्यांची आणि अंबादासदानवे यांच्या भेटीने चर्चा रंगवल्या.  हेच कारण आहे की, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस प्रमाणेच शिवसेनेच्या विलिकरणाच्या चर्चा सुरू आहेत. अशातच अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यांनी शिवसेनेच्या विलिकरणावर बोलताना, ‘विलिनीकरण करायचे की गळाभेट घ्यायची, हे शिंदे ठरवतील’ असे स्पष्ट म्हटले आहे.

खासदार संजय राऊत यांनी नुकतात पश्चाताप व्यक्त करायचा असेल तर मातोश्री दारे उघडी आहेत असे म्हटले होते. त्यावर बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की, आमचे वरिष्ठ नेते, पक्षप्रमुख हे शिंदेंचा जो निर्णय असेल तो अंतिम असणार आहे. भविष्यात जे आदेश देतील तो मान्य करू. विलिनीकरण करायचे की गळाभेट घ्यायची हे शिंदे ठरवतील. हा अधिकार त्यांना आहे. त्यांच्या विश्वासावर आम्ही बदल केला. आम्ही चांगलं काम केलं असेल तर भाजपने ते मान्य केलं पाहिजे.

Published on: Jun 03, 2026 01:23 PM

Follow Us