Abu Azmi : चार फूट हाईट का दिमाख खराब लडका…अबू आझमींकडून नितेश राणेंवर जिव्हारी लागणारी टीका
अबू आझमींनी नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला. त्यांनी समाजात द्वेष पसरवणाऱ्या घटनांवर प्रकाश टाकला, सावंतवाडीतील फुलावाल्याच्या आत्महत्येचा उल्लेख केला. आझमींनी सरकारवर मुस्लिमविरोधी धोरणे अवलंबल्याचा आरोप करत मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणांतील न्यायव्यवस्थेतील विषमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
अबू आझमींनी अलीकडेच महाराष्ट्रातील राजकारणावर भाष्य करताना नितेश राणेंवर तीव्र टीका केली. मशिदीत घुसून मुस्लिमांना मारू या राणेंच्या कथित वक्तव्यावर त्यांनी आक्षेप नोंदवला. आझमींनी सावंतवाडीतील एका फुलावाल्याच्या आत्महत्येचा उल्लेख करत, त्याला जातीय द्वेषातून फूल आणि खेळणी विकण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप केला. या घटनेत कारवाई न झाल्याबद्दल त्यांनी सरकारवर टीका केली. यावेळी चार फूट हाईट का दिमाख खराब लडका असं म्हणत अबू आझमींकडून नितेश राणेंवर जिव्हारी लागणारी टीका करण्यात आली.
आझमींच्या मते, देशात द्वेषाचे वातावरण निर्माण केले जात आहे. गाय आणि बैल यांसारख्या मुद्द्यांवरून लोकांची हत्या होत आहे. त्यांनी स्वतःला देशाशी निष्ठावान परंतु सरकारचा शत्रू असे संबोधत, प्रेम आणि एकोप्याचा संदेश पुढे नेण्याची आपली जबाबदारी असल्याचे सांगितले. मुंबई बॉम्बस्फोट आणि मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणांमध्ये न्यायव्यवस्थेच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

