Aditya Thackeray : ‘गद्दार गद्दारच असतो हे सरकार कोसळणार, लिहून घ्या, माजी मंत्री आदित्य ठाकरेंची टीका
तुम्ही त्यांचे खरे चेहरे बघताय गद्दारी झालेली आहे तो गद्दारा गद्दारच असतो हे सरकार हे कोसळणार आपण लिहून घ्या कारण कुठचाही पक्ष खुश नाही, आदित्य ठाकरेंची टीका.
सोलापूर : ‘गद्दारा गद्दारच असतो हे सरकार हे कोसळणार आपण लिहून घ्या,’ असा हल्लाबोल माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी (Aditya Thackeray) सोलापूर (Solapur) दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर केला आहे. यावेळी ठाकरे म्हणालेत की, ‘आदित्य मुलासारखा आहे ते असं आहे खरंच त्यांचे मनात विचार होते ते आता लोकांसमोर यायला लागलेले आहेत जे आत्तापर्यंत शिवसेना (Shiv sena) म्हणून स्वतःला म्हणत होते कारण त्यांना जी काही कारवाई होती ती टाळायची होती आता तुम्ही त्यांचे खरे चेहरे बघताय आणि गद्दारी झालेली आहे तो गद्दारा गद्दारच असतो हे सरकार हे कोसळणार आपण लिहून घ्या कारण आपण एक बघा आता कुठचाही राजकीय पक्ष खुश नाही गद्दारीच हे जे काही पॅटर्न आहे हे इतर राज्यांमध्ये जायला लागलं तर देशात असतील तर म्हणू शकते. आपण बघाल की हे जे काही 40 लोक आहेत आणि बारा खासदार आहेत ह्यांना जनतेसमोर जावंच लागणार आहे आणि जनता एक निकाल देईल तो जनता ठरवते त्याच्यावर काही बोलणार नाही,’ असं म्हणत आदित्य यांनी शिंदेगटाला (Eknath Shinde) प्रत्त्युत्तर दिलंय.
Published on: Aug 02, 2022 01:06 PM
खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली... रुपाली ठोंबरेंना राग अनावर,
पंतप्रधान मोदी म्हणजे...एकनाथ शिंदेंचा शायराना अंदाज; केल तोंडभरून कौत
एकच खळबळ! काँग्रेसच्या अत्यंत विश्वासू नेत्याचा अर्ज बाद झाल्याने...
ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हा
