आदित्य ठाकरे यांनी सांगितलं मुख्यमंत्री कुठे बोलतात आणि कुठे नाही याचे कारण
मुंबईच्या साडे सहा हजार कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन झाले. टेंडर काढले गेले. पण यात जनतेचा विशासघात केला गेला असा आरोप माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
मुंबई : मुंबईच्या साडे सहा हजार कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन झाले. टेंडर काढले गेले. पण यात जनतेचा विशासघात केला गेला असा आरोप माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. टेंडरची जी पाकिटे काढण्यात आली त्यातील पाचपैकी दोन पाकिटे अजून उघडली नाहीत. जी तीन पाकिटे उघडली ती कोणाची होती ? या आधी पत्रकार परिषद घेऊन मुंबईच्या जनतेचे मी साडे चारशे कोटी वाचवले. आताही मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. यामुळे सुमारे साडे सहाशे कोटी वाचणार आहेत. मुंबईकरांच्या पैसे सरकारच्या ठेकेदार मित्रांना देता काम नये, असे ते म्हणाले. राज्यपाल कोश्यारी यांना हटवण्यात आले नाही. तर जे १३ राज्यपाल बदलले त्यात त्यांचे नाव घेतले गेले. महाराष्ट्राच्या अस्मिता पुरुषांचा आपणां होत असताना, स्वाभिमान मोडला जात असताना मुख्यमंत्री काही बोलत नव्हते. जिथे जिथे स्वाभिमान मोडला जातो, तिथे तिथे मुख्यमंत्री कुठेही बोलत नाहीत, अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली.
Published on: Feb 13, 2023 10:33 AM
एकच खळबळ! रात्रभर पोलिसांचा ओसाड बंगल्यावर शोध सुरूच, अखेर मध्यरात्री
फडणवीसानंतर मुख्यमंत्री कोण? राज्यातील बड्या नेत्याने थेट नावच घेतलं,
राम मंदिरातील कथित चोरीबाबत ठाकरे गट आक्रमक; थेट घेतला मोठा निर्णय
6 फुटीर खासदारांचे थेट लोकसभा अध्यक्षांसोबतचे जुने फोटो व्हायरल; एका
