VIDEO : चांगला प्रकल्प होत असेल तर स्थानिकांना विश्वासात घेऊ – Aaditya Thackeray
कुठलाही प्रकल्प होत असताना स्थानिक लोकं महत्त्वाची आहेत. लोकांची इच्छा आणि होकार असेल तर नक्की पुढे जाऊ. लोकांचा विश्वास जिंकूनच आपल्याला पुढे जायचं आहे. लोकांना डावलून पुढे जात नाही, असं सांगतानाच नानारमध्ये रिफायनरी होणार नाही, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
कुठलाही प्रकल्प होत असताना स्थानिक लोकं महत्त्वाची आहेत. लोकांची इच्छा आणि होकार असेल तर नक्की पुढे जाऊ. लोकांचा विश्वास जिंकूनच आपल्याला पुढे जायचं आहे. लोकांना डावलून पुढे जात नाही, असं सांगतानाच नानारमध्ये रिफायनरी होणार नाही, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं. नाणार समर्थकांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना नाणारमध्ये रिफायनरी होणार नसल्याचं सांगतानाच धोपेश्वरमध्ये लोकांशी चर्चा केली जाईल, असं स्पष्ट केलं. तर कुठेही प्रकल्प झाला तरी हरकत नाही. फक्त विकास झाला पाहिजे, असं त्यांनी स्पष्ट केलं. विदर्भात रिफायनरी प्रकल्प नेण्याची भाजपकडून (bjp) मागणी होत आहे. त्याबाबतचा प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरे यांनी ही भूमिका स्पष्ट केली.
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...

