AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amol Kolhe | बैलगाडा शर्यतीवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी, खासदार अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?

| Edited By: | Updated on: Dec 15, 2021 | 7:45 PM
Share

ज्या पद्धतीने युक्तिवाद मांडला गेला, त्यावर न्यायालयाचे निरीक्षण सकारत्मक वाटते. उद्या या प्रकरणावर सकारात्मक निकाल लागेल, अशी आशा वाटते. बैलांबाबत अमानुषता टाळून बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असेही अमोल कोल्हे म्हणाले.

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात आज सुनावणी सुरू झाली. मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे. महाराष्ट्रालाच का डावलेले जाते, असा युक्तिवाद करण्यात आला. राज्यांच्या सीमांमुळे बैलांमध्ये कसा फरक पडू शकतो, असा मुद्दा मांडला गेला. ही सुनावणी हंगामी निकालासाठी पाच सदस्य खंडपीठापुढे सुनावणी होत नाही, तोपर्यंत अंतिम निकाल लागणार नाही. ज्या पद्धतीने युक्तिवाद मांडला गेला, त्यावर न्यायालयाचे निरीक्षण सकारत्मक वाटते. उद्या या प्रकरणावर सकारात्मक निकाल लागेल, अशी आशा वाटते. बैलांबाबत अमानुषता टाळून बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असेही अमोल कोल्हे म्हणाले.