राष्ट्रवादी टार्गेटवर, तर विरोधकांवर दबाव, हे भाजपचं षडयंत्र”, अनिल देशमुख यांची टीका
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावर सध्या ईडीचा ससेमीरा सुरु आहे. जयंत पाटील यांची ईडी चौकशीही करण्यात आली आहे. त्यांच्या या चौकशीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे.
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावर सध्या ईडीचा ससेमीरा सुरु आहे. जयंत पाटील यांची ईडी चौकशीही करण्यात आली आहे. त्यांच्या या चौकशीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. “दोन-अडीच वर्षात विरोधकांना टार्गेट करून त्रास दिला जात आहे. खासकरून राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट केलं जात आहे. माझ्यावर सुद्धा कारवाई झाली, त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. गेल्या 50-60 वर्षात इतक्या खालच्या स्तराचे राजकारण महाराष्ट्रात कधीही झालं नाही.देशात कारवाई सुरू असलेला भाजपचा एक सुद्धा नेता सापडणार नाही. त्रास द्यायचा, राजकीय दबाव आणायचा असं षडयंत्र सुरू आहे”, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे.
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी...
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न...
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा...
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक...
