AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीला टार्गेट केलं जातंय, पण याला आम्ही घाबरणार नाही!-अनिल देशमुख

मुद्दाम त्रास दिला जातोय, मलाही टार्गेट केलं गेलं, पण...; अनिल देशमुख नेमकं काय म्हणाले? पाहा...

राष्ट्रवादीला टार्गेट केलं जातंय, पण याला आम्ही घाबरणार नाही!-अनिल देशमुख
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: May 23, 2023 | 12:08 PM
Share

कोल्हापूर : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची काल साडे नऊतास चौकशी झाली. यावर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनिल देशमुख यांनी भाजपवर टीका केलीये. दोन अडीच वर्षात विरोधकांना टार्गेट करून त्रास दिला जातोय. माझ्यावर सुद्धा कारवाई झाली. पण त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. विरोधकांना त्रास मात्र दिला जातोय, असं अनिल देशमुख म्हणालेत.

गेल्या 50-60 वर्षात कधीही झालं नाही. इतक्या खालच्या स्तराचं राजकारण महाराष्ट्रात कधीही झालं नाही. आता वातावरण बिघडलं आहे. विरोधकांना त्रास देण्याचं फक्त महाराष्ट्रातच नाही तर बाहेरच्या राज्यात सुद्धा सुरू आहे. राष्ट्रवादीला ठरवून टार्गेट केल जातं आहे, असं ते म्हणालेत.

तपास यंत्रणांकडून कारवाई सुरू असलेला भाजपचा एक सुद्धा नेता महाराष्ट्रातच नाही तर देशात सुद्धा सापडणार नाही. फक्त विरोधकांना त्रास द्यायचं सुरू आहे. राजकीय दबाव आणायचा असं षडयंत्र सुरू आहे, असं अनिल देशमुख म्हणालेत.

निवडणुका जवळ आल्या आहेत. अशात युती आणि महाविकास राजकीय पक्षांच्या जागा वाटपाचा मुद्दा राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. यावरही अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आजच्या परिस्थितीत आमचे जास्त आमदार-खासदार आहेत. मोठे भाऊ-छोटे भाऊ असले तरी सर्वांचा एकमेकांशी प्रेमाचा व्यवहार आहे. त्यात शंका घ्यायचं कारण नाही. याचा जागा वाटपावर परिणाम होणार नाही, असं ते म्हणालेत.

आज भारतीय जनता पार्टीच्या विरोधात वातावरण आहे. प्रत्येक राजकीय पक्ष प्रयत्न करतो. तसं त्यांचं चालू असतील. ज्या पद्धतीचं वातावरण आहे ते पाहता भारतीय जनता पार्टीने कितीही प्रयत्न केले तरी फरक पडणार नाही. भारतीय जनता पार्टीच्या गेल्या अनेक वर्षापासूनच्या तिन्ही जागा ते हरले आहेत. त्यामुळे भाजपचा पराजय अटळ आहे आणि आमचा विजय निश्चित आहे, असंही अनिल देशमुख म्हणालेत.

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार