नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; सरकारने केली मोठी घोषणा, अनिल पाटील म्हणाले…
राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे शेतीचं, पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. उभी पिकं पाण्याखाली गेली आहेत. हाता तोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतला.शेतकरी हवालदिल झालाय. अशात सरकारकडून आता आजपासून पंचनामे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबई, 26 जुलै 2023 | राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे शेतीचं, पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. उभी पिकं पाण्याखाली गेली आहेत. हाता तोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतला.शेतकरी हवालदिल झालाय. अशात सरकारकडून आता आजपासून पंचनामे आदेश देण्यात आले आहेत. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, “आपापल्या विभागात ताबडतोब पंचनामे करण्याचे निर्देश राज्यातील सगळे आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. 5 हजाराची मदत तुटपुंजी होती ती 10 हजार करण्याच येईल, उद्याच्या कॅबिनेटमध्ये त्याबाबत निर्णय होईल. उद्यापर्यंत ९५ टक्के पंचनामे पूर्ण झालेले असतील.”
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह

