Anjali Damania : …यापूर्वी फडणवीसांनी सोडवलं पण आता मोदी पण.., दमानिया उद्या सकाळी 10 वाजता कोणता फोडणार बॉम्ब?
अंजली दमानिया यांनी मेघदूत बंगल्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. पुण्यातील पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणी ही भेट झाल्याचे समोर आले आहे. दमानिया यांनी सिंचन, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक, आणि जरंडेश्वर घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे सांगितले. ४२ कोटींचा व्यवहार रद्द करण्याच्या सरकारच्या नोटिसीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
अंजली दमानिया यांनी मेघदूत बंगल्यावर भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे. ही भेट पुण्यातील पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणाशी संबंधित असल्याची माहिती मिळत आहे. या भेटीनंतर अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वपूर्ण घोषणा केल्या.
दमानिया म्हणाल्या की, त्या उच्च न्यायालयात सिंचन घोटाळा, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा आणि जरंडेश्वर घोटाळा यासंदर्भात अपील करणार आहेत. फडणवीसांनी सिंचन घोटाळ्यातून सोडवले असले तरी, यापुढील कोणत्याही घोटाळ्यात फडणवीस, अमित शाह किंवा मोदी कोणीही मदत करू शकणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला.
कोर्टाकडून आदेश मिळवून कोणालाही एकाही केसमधून बाहेर येऊ देणार नाही, असा त्यांचा निर्धार आहे. सरकारने ४२ कोटी रुपये देऊन एक व्यवहार रद्द करण्याबद्दल जी नोटीस काढली आहे, ती चुकीची असल्याचे दमानिया यांनी नमूद केले. हा अधिकार महसूल विभागाकडे नसून तो केवळ सिव्हिल कोर्टच देऊ शकते, असे त्यांचे म्हणणे आहे. चोरीचा माल परत देऊन किंवा व्यवहार रद्द करून प्रकरण संपत नाही, असे सांगत, या सर्व प्रकरणांचा एक मोठा खुलासा उद्या सकाळी १० वाजता करणार असल्याचे दमानिया यांनी घोषित केले.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

