Ashok Kharat Case | अशोक खरात प्रकरणात नवे आरोप-प्रत्यारोप; दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप
भोंदू अशोक खरात प्रकरणात नव्या घडामोडींना वेग आला असून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही पुरावे समोर आणत अनेक राजकीय नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी दावा केला की, रुपाली चाकणकर यांच्यासह अनेक नेते अशोक खरातच्या संपर्कात होते.
भोंदू अशोक खरात प्रकरणात नव्या घडामोडींना वेग आला असून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही पुरावे समोर आणत अनेक राजकीय नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी दावा केला की, रुपाली चाकणकर यांच्यासह अनेक नेते अशोक खरातच्या संपर्कात होते. दमानिया यांनी सांगितले की, त्यांना मिळालेली माहिती त्यांनी यापूर्वी डीजी कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय तसेच एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्याकडे पाठवली होती. “मी जेव्हा अशा प्रकरणांवर काम करते, तेव्हा अनेक माहिती माझ्यापर्यंत येते,” असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, या प्रकरणावर संपादिका जयश्री खाडिलकर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी दमानिया यांना पोलिसांनी ताब्यात घ्यावे, अशी मागणी केली आहे. दमानिया यांनी अपूर्ण माहितीच्या आधारे आरोप करून संबंधितांची बदनामी केल्याचा आरोप खाडिलकर यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता आरोप-प्रत्यारोप अधिकच तीव्र झाले आहेत.
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ

