Special Report | एकनाथ शिंदे यांच्यामुळे भाजप सत्तेत, बच्चू कडू का झाले आक्रमक?
शिवसेनेच्या जाहिरीतमुळे भाजपमध्ये नाराजीचं वातावरण असताना, आमदार बच्चू कडू यांच्या वक्तव्याने त्यात भर घातली आहे. 'राष्ट्रात मोदी, राज्यात शिंदे' या जाहिरातीवरून महायुतीत वादाची ठिणगी उडाली आहे. भाजप नेत्यांमध्ये या जाहिरातीवरून नाराजी व्यक्त केली जात असताना, बच्चू कडू यांनी भाजपवरच हल्लाबोल चढवला आहे.
अमरावती : शिवसेनेच्या जाहिरीतमुळे भाजपमध्ये नाराजीचं वातावरण असताना, आमदार बच्चू कडू यांच्या वक्तव्याने त्यात भर घातली आहे. ‘राष्ट्रात मोदी, राज्यात शिंदे’ या जाहिरातीवरून महायुतीत वादाची ठिणगी उडाली आहे. भाजप नेत्यांमध्ये या जाहिरातीवरून नाराजी व्यक्त केली जात असताना, बच्चू कडू यांनी भाजपवरच हल्लाबोल चढवला आहे. “एकनाथ शिंदे यांनी उठाव केला नसता, तर भाजप सत्तेत नसती. मात्र तरीही 40 आमदारांच्या मतदारसंघात भाजपकडून त्रास होत असल्याचा” थेट आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. या आरोपनंतर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी “बच्चू कडू बरोबर बोलले, वाजपेयींचं सरकार एका मतानं पडलं होतं”, असा इशारा दिला आहे. बच्चू कडू यांच्या या आरोपानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी “बच्चू कडू यांनी असं बोलू नये”, अशी प्रतिक्रिया दिली आहे. आधी जाहिरात, आता बच्चू कडू यांच्या विधानामुळे महायुतीत वाद चिघळणार का? यासाठी पाहा स्पेशल रिपोर्ट…
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं

