…तर इतकी वर्षे राष्ट्रवादीने जनतेची फसवणूक केली; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
Prakash Ambedkar on NCP : मविआच्या वज्रमूठ सभेला जाणार का?; प्रकाश आंबेडकर यांनी वंचितची स्पष्ट केली. पाहा व्हीडिओ...
बदलापूर : वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीवर घणाघात केलाय. राष्ट्रवादी आधी स्वत:ला शाहू, फुले, आंबेडकरवादी म्हणवत होती. आता ते भाजपसोबत जात असतील तर त्यांनी इतकी वर्ष फसवलं आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. राष्ट्रवादी सरड्यासारखा रंग बदलतेय. पूर्वी शाहू, फुले, आंबेडकरी विचारांचा त्यांचा रंग होता. आता भाजप आणि शिवसेनेचा जो रंग आहे तसा राष्ट्रवादीचा होतोय की काय अशी चर्चा सुरू झालीये, असंही प्रकाश आंबेडकर म्हणालेत. आम्ही आधीच स्पष्ट केलं आहे की, महाविकास आघाडीसोबत आमचा काही समझोता नाही, संबंध नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जाहीर केलं आहे की, आम्ही वंचित बहुजन आघाडीसोबत समझोता करू शकत नाही, त्यामुळे त्या सभेचा आणि आमचा काही संबंध नाही, असंही ते म्हणालेत.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........

