बेल्हे जेजुरी महामार्ग पाण्याखाली, जीव धोक्यात घालून प्रवास
जोरदार पावसामुळे बेल्हे जेजुरी महामार्ग पाण्याखाली गेला आहे. तरीही परिसरातील काही नागरिक जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून प्रवास करत आहेत.
राज्यातील काही भागात जोरदार पाऊस कोसळत असून अजूनही काही रस्ते पाण्याखालीच असल्याचे दिसून येत आहे. भीमाशंकर परिसरातही जोरदार पाऊस होत असून घोडे नदीला पुराचा फटका बसला आहे. या पुराच्या पाण्यामुळे परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तरीही नागरिक पुराच्या पाण्यातून वाट काढत जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. घोडे नदीला पूर आल्याने बेल्हे-जेजुरी महामार्ग पाण्याखाली गेला असून शिरुर आंबेगाव तालुक्याचा संपर्क तुटला आहे. परिसरात जोरदार पाऊस सुरु असल्याने भीमाशंकर परिसरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Published on: Sep 18, 2022 12:35 PM
Follow Us
Latest Videos
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
