अवकाळी पावसाचा पिकांना फटका, शेतात पाणी साचल्यानं ‘या’ पिकांनी टाकली मान
VIDEO | भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका, शेतात पाणी साचल्याने पिकांचं मोठं नुकसान
भंडारा : गेल्या दोन दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात येत असलेल्या अवकाळी पावसाचा फटका काकडी, डांगरू पिकांना बसला आहे. तर अवकाळी पावसामुळे ढेमसंच्या शेतीत पाणी साचल्यामुळे ढेमसं उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलेला आहे. अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील फळ बागायती उत्पादकांना मोठया प्रमाणात फटका बसला आहे. ढेमसे, डांगरू, काकडी अशा फळ बागांनी शेकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला. तेव्हा शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्वरीत नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. तर गेल्या दोन दिवसांपूर्वी भंडारा जिल्ह्यात रात्री आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे टमाटे, मिरची पिकांचे प्रचंड नुकसान झाले. भंडारा जिल्ह्यात अचानकपणे कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील टमाट्याची पिकं गळून पडली तर मिरची आणि इतर काही पिकेही जमीनदोस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र, स्नेहभोजनाचा कार्यक्रम; सुनेत्रा पवार जा
मोठी बातमी! शिंदेंच्या कार्यकाळात सुरु केलेलं प्रकल्प पंकजा मुंडेंकडून
कलिंगड प्रकरणात सस्पेन्स, बिर्याणीने मृत्यू नाही? तपास सुरु
मंत्रालयातील पाणी प्यायल्याने कर्मचाऱ्यांंना उलट्या, पाण्याच्या टाकीत

