Maratha Reservation Rally : जरांगे पाटील काही मागे हटेना… भाजपचा पहिला नेता आंदोलनस्थळी भेटीला, दिलं मोठं आश्वासन
मनोज जरांगे पाटलांनी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हटणार नाही, आणि मुंबई सोडणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. आता जरांगेंच्या या आंदोलनाला नेत्यांचाही पाठिंबा मिळताना दिसत आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाला मनोज जरांगे पांटील यांनी काल सुरुवात केली असून त्यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी हजारो मराठा बांधव मुंबईत काल धडकले. या आंदोलनाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून सर्वसामान्यांसह राजकीय वर्तुळातील नेते मंडळींकडून देखील पाठिंबा मिळत आहे. आंदोलन सुरू झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी सर्वात प्रथम प्रकाश सोळंके आणि संदीप क्षीरसागर आंदोलनस्थळी दाखल होत आपला पाठिंबा दर्शवला.
तर दुसरीकडे आंदोलनाच्या पहिल्या दिवशी परभणीचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव, धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर आणि धाराशिव-कळंबचे आमदार कैलास पाटील हे मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी आझाद मैदानावर पोहोचले होते. यानंतर माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांच्यासह गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनीही आज मनोज जरांगेची आझाद मैदानावर भेट घेतली. यानंतर भाजपचा पहिला नेता सुरेश धस हे देखील जरांगेंच्या भेटीला धावले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर गाऱ्हाणं मांडू असा शब्द दिला.
Published on: Aug 30, 2025 10:42 AM
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
