Chandrakant Khaire: लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नव्हे तर केवळ राजकारणासाठी भाजपचा मोर्चा चंद्रकांत खैरेंची टीका
मात्र लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नव्हे तर केवळ राजकारण करण्यासाठी भाजपचे हे आंदोलन करण्यात येत असल्याची टीका चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. औरंगाबादचा पाणी प्रश्न भाजप मुळेच राखडल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
औरंगाबाद – शहरात पाण्याचे वाढते दुर्भिक्ष लक्षात घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात आज औरंगाबादेत ‘जल आक्रोश मोर्चा’ काढला जात आहे. इतकी वर्षे सातत्याने महापालिकेत सत्ता असूनही संभाजीनगरमध्ये पाण्याचा जो सत्यानाश शिवसेनेच्या काळात झाला, त्याची फळं औरंगाबादकर भोगत आहेत, अशी टीका फडणवीस यांच्याकडून करण्यात आली आहे. मात्र लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नव्हे तर केवळ राजकारण (Politics) करण्यासाठी भाजपचे हे आंदोलन करण्यात येत असल्याची टीका चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire)यांनी केली आहे. औरंगाबादचा पाणी प्रश्न भाजप मुळेच राखडल्याचेही त्यांनी म्हटले आहे.या मोर्च्यात मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...

