AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदित्य ठाकरे जे बोलले ते सत्यच; अंबादास दानवे यांचं वक्तव्य

आदित्य ठाकरे जे बोलले ते सत्यच; अंबादास दानवे यांचं वक्तव्य

| Edited By: | Updated on: Apr 13, 2023 | 1:33 PM
Share

नाशिकला होणारा महिला मेळावा हा नियमित आहे. एखादा नेता गेला म्हणून पडझड होत नाही, असं अंबादास दानवे म्हणाले आहेत. अण्णा हजारे धमकी प्रकरणी सरकारने कारवाई करावी, असंही दानवे म्हणाले आहेत.

छत्रपती संभाजीनगर : वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडावर महत्वाचं विधान केलं. एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले. तेव्हा त्यांनी आपल्या मनातील भीती बोलून दाखवली. भाजपसोबत गेलो नाही तर मला जेलमध्ये टाकतील, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यावर ठाकरे गटाचे नेते, विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे जे बोलले ते सत्य आहे, जे लोक शिवसेनेतून निघून गेले त्यांना भाजपने अडकवण्याचा प्रयत्न केला, असं अंबादास दानवे म्हणाले आहेत.

Published on: Apr 13, 2023 01:33 PM