CM Fadnavis : लोकशाहीच्या हत्येचा काळा अध्याय… आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण, फडणवीसांनी लेखात काय म्हटलंय?
'आज जी व्यवस्था पाकिस्तानची आहे तीच भारताचीही झाली असती. आज जी लोकशाही जिवंत आहे ती 50 वर्षांपूर्वी संघर्ष केलेल्या त्या नेत्यामुळे. गांधी घराण आणि काँग्रेसने केलेल्या शोषणाच्या कथा जितक्या प्रकर्षाने पुढे येतील त्यातून लोकशाही अधिक भक्कम होत जाईल.'
लोकशाहीच्या हत्येचा काळा अध्याय… आणिबाणीला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी वृत्तपत्रात एक विशेष लेख लिहित काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. देशातील एका काळ्या कुट्ट अध्यायाला आज 50 वर्ष झाली, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आणीबाणीने अनेक कुटुंबांना उद्ध्वस्त केल्याचही फडणवीस या लेखात म्हणालेत.
मुख्यमंत्री फडणवीसांच्या लेखात काय?
’25 जून 1975. देशातील एका काळ्या कुट्ट अध्यायाला आज 50 वर्ष पूर्ण झाली. त्यात सुवर्ण महोत्सव म्हणायचं तरी कसं? महोत्सव हा चांगल्याचा करायचा असतो. संविधान आणि संवैधानिक व्यवस्था आणि लोकशाही पायातून उडवणाऱ्या काँग्रेसने लिहिलेल्या या अध्यायाला 50 वर्ष झाली. आणिबाणीने अनेक कुटुंबांना उद्ध्वस्त केले. अनेकांनी आपले आप्तस्वकीय गमावले. घरातील कमावती व्यक्ती कारागृहात असताना अनेक कुटुंब कर्जबाजारी झाली. मानसिक आणि आर्थिक अशा दोन्ही पातळ्यांवर मोठं शोषण झालं.’, असं फडणवीस म्हणाले.
पुढे लेखात असंही म्हटलं की, मी केवळ पाच वर्षांचा होतो. माझे वडील दिवंगत गंगाधरराव फडणवीस यांनाही अटक झाली होती. कारागृहात डबा द्यायला जातना किंवा त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेताना फक्त भेट होत असे. लहान वयात वडिलांपासून बराच काळ दूर रहावे लागलं त्यामुळे मनातून चिड होतो. आणीबाणीनंतर विधीपालिका, कार्यपालिका आणि न्यायपालिका या व्यवस्थांच महत्त्व अधिक अधोरेखित झालं. लोकशाहीच महत्त्व काय हे अधिक प्रकर्षाने लोकांना समजलं. संविधानावरील श्रद्धा अधिक दृढ झाली. त्या नेत्यांनी संघर्ष केला नसता तर कदाचित आपल्या देशात सुद्धा हुकूमशाही प्रस्थापित झाली असती.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

