Thane Alliance : जितेंद्र आव्हाडांमुळेच आघाडीत मिठाचा खडा, काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या आरोपानं खळबळ!
ठाणे शहर काँग्रेस प्रभारी श्रीरंग बर्गे यांनी जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप केला आहे. चर्चा सुरू असतानाही आव्हाडांनी ऐनवेळी उमेदवार दिल्याने ठाण्यात आघाडी तुटली, असे बर्गे म्हणाले. या निवडणुकीच्या निकालास आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) जबाबदार असतील, असेही त्यांनी म्हटले आहे.
ठाण्यात महाविकास आघाडीमध्ये निर्माण झालेल्या तणावासाठी काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांना जबाबदार धरले आहे. ठाणे शहर काँग्रेसचे प्रभारी श्रीरंग बर्गे यांनी हा गंभीर आरोप केला आहे. आघाडीच्या जागा वाटपाबाबत चर्चा सुरू असतानाच, जितेंद्र आव्हाड यांनी ऐनवेळी वॉर्डमध्ये उमेदवार उभे केले, ज्यामुळे आघाडीत बिघाड झाला, असे बर्गे यांनी स्पष्ट केले.
श्रीरंग बर्गे यांच्या म्हणण्यानुसार, अर्ज भरण्याच्या आदल्या रात्री ९ वाजता आघाडी होणार नाही, असे सिद्ध झाले. काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण हे ठाण्यात काँग्रेसला ३०-३५ जागा मिळतील यासाठी प्रयत्नशील होते. मात्र, आव्हाडांनी अचानक उमेदवार दिल्याने आघाडीत मिठाचा खडा पडला. ठाणे निवडणुकीत जो काही निकाल लागेल, त्याची संपूर्ण जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष आणि विशेषतः जितेंद्र आव्हाड यांची असेल, असेही बर्गे यांनी म्हटले आहे. या घटनेमुळे ठाण्यातील स्थानिक राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे.
नांदेडमध्ये शिंदे गटात खळबळ; आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक
देवेंद्र फडणवीस यांची जळगावात भव्य प्रचार रॅली, तुफान गर्दी अन्...
छ. शिवाजी महाराजही पाटीदार.... भाजप मंत्र्याच्या विधानानं राजकीय वादंग
काँग्रेस कार्यकर्त्याच्या अनोख्या प्रचारानं नागपूरमध्ये तुफान चर्चा

