AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis | जगातील शहरांमध्ये मुंबईची गणना, पण मुंबईत जागा कमी : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis | जगातील शहरांमध्ये मुंबईची गणना, पण मुंबईत जागा कमी : देवेंद्र फडणवीस

| Edited By: | Updated on: Dec 25, 2021 | 4:12 PM
Share

जगातील शहरामध्ये मुंबईची गणना होते. पण आज मुंबईत जागा कमी आहे. मोकळी मैदाने जपणं गरजेचं आहे. कफ परेडमध्ये पाळीव प्राण्यांसाठी जागा देण्यात आली आहे. ही चांगली गोष्ट आहे. पाळीव प्राण्यांमुळे आत्मिक अनुभूती होते, असंही ते म्हणाले.

राज्यातील कोणत्या शेतकऱ्यांमध्ये आत्महत्येचं प्रमाण अधिक आहे याची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपली जनावरं विकली त्या शेतकऱ्यांमध्ये आत्महत्यांचं प्रमाण अधिक असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

देवेंद्र फडणवीस हे कफ परेड येथे एका कार्यक्रमाला आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्याबाबत संवेदनशीलता वाढवली पाहिजे. अनेकदा छोट्या छोट्या कारणांनी शेतकऱ्यांना मदत मिळण्यापासून अपात्रं केलं जातं ते योग्य नाही. आठवडाभर ते पंधरा दिवसात शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे. पण या सरकारमध्ये कोणीच संवेदनशील नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळेल असं वाटत नाही, असं फडणवीस यांनी सांगितलं. ज्या शेतकऱ्यांनी आपली जनावरं विकली त्या शेतकऱ्यांमध्ये आत्महत्येचं सर्वाधिक प्रमाण असल्याचं एका रिपोर्टमधून समोर आलं आहे. शेतकरी आपलं दु:ख सुद्धा गायी आणि बैलासोबत वाटतो, असं त्यांनी सांगितलं.

एक सुंदर गार्डन आणि पेट पार्क सुद्धा कफ परेडवासियांना मिळत आहे. त्यासाठी हर्षिता, मकरंद आणि राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन करतो. एसबी सोमाणी यांनी 70 च्या दशकात शिक्षणाच्या क्षेत्रात आपल्या कामाची आधारशीला ठेवली. अनेकांना शिक्षित करण्याचं काम सोमाणी यांनी केले आहे, असं ते म्हणाले.

जगातील शहरामध्ये मुंबईची गणना होते. पण आज मुंबईत जागा कमी आहे. मोकळी मैदाने जपणं गरजेचं आहे. कफ परेडमध्ये पाळीव प्राण्यांसाठी जागा देण्यात आली आहे. ही चांगली गोष्ट आहे. पाळीव प्राण्यांमुळे आत्मिक अनुभूती होते, असंही ते म्हणाले.

Published on: Dec 25, 2021 04:12 PM