AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंबादासजी, आधी पूर्ण प्रक्रिया समजून घ्या!; नामांतरावरून दावनेंचा सवाल, देवेंद्र फडणवीसांचं जोरदार प्रत्युत्तर

अंबादासजी, आधी पूर्ण प्रक्रिया समजून घ्या!; नामांतरावरून दावनेंचा सवाल, देवेंद्र फडणवीसांचं जोरदार प्रत्युत्तर

| Updated on: Feb 25, 2023 | 9:39 AM
Share

औरंगाबादच्या नामांतरावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्विट करत सरकारला आणि विशेषत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल विचारलेत. त्यांच्या या प्रश्नांना देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. पाहा...

मुंबई : औरंगाबादच्या नामांतरावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्विट करत सरकारला आणि विशेषत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल विचारलेत. त्यांच्या या प्रश्नांना देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “अंबादास जी, आधी पूर्ण प्रक्रिया समजून घ्या. केंद्र सरकारची मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली की, आधी सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना काढते, तेव्हा शहरांची नावे बदलतात. ही अधिसूचना जारी झाली आहे, त्यानुसार औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण झाले आहे. त्यानंतर महसूल व वन विभाग तसेच नगरविकास विभाग अधिसूचना जारी करेल, तेव्हा संपूर्ण जिल्ह्याचे, तालुक्याचे, महापालिका आणि नगरपालिकेचे सुद्धा नाव बदलेल. दोन्ही जिल्ह्यांसंदर्भात याचीही प्रक्रिया सुरू झाली आहे. आम्ही जेव्हा काही करतो तेव्हा ते पूर्णच करतो. अर्धवट काहीच ठेवत नाही!”, असं ट्विट करत फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

Published on: Feb 25, 2023 09:39 AM