AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कळसूत्री सरकारने पंचसूत्रीच्या माध्यमातून विकास पंचतत्वात विलीन केला, फडणवीस आक्रमक

कळसूत्री सरकारने पंचसूत्रीच्या माध्यमातून विकास पंचतत्वात विलीन केला, फडणवीस आक्रमक

| Edited By: | Updated on: Mar 11, 2022 | 4:55 PM
Share

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी (Ajit Pawar)  हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असल्याचे सांगितले आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnaivis)या अर्थसंकल्पावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आमच्याच कामांची या सरकारने पुन्हा घोषणा केली असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे.

मुंबई : राज्यांचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2022) आज सादर झाल्यांतर राज्याच्या राजकारणात जोरदार खडाखडी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी (Ajit Pawar)  हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असल्याचे सांगितले आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnaivis)या अर्थसंकल्पावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आमच्याच कामांची या सरकारने पुन्हा घोषणा केली असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. त्यामुळे राज्यातलं राजकारण पुन्हा तापलं आहे. कळसूत्री सरकारने विकासाचे पंचसूत्री मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या पंचसूत्रीने काही होणार नाही. याने महाराष्ट्रच्या विकासाला पंचतत्वात विलीन केले आहे. सर्वांच्या तोंडाला काळं फसण्याचे काम या सरकारने केले आहे. हे बजेट विकासाला चालना देऊ शकत नाही. या बजेटमध्ये काही नाही. चालू कामांच्या घोषणा या बजेटमध्ये केल्या, असा आरोप फडणवीसांनी केला आहे.

Published on: Mar 11, 2022 04:55 PM